शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

coronavirus: एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करा,  गोपीचंद यांची बीडब्ल्यूएफला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 04:23 IST

जगभरात आतापर्यंत ४१ लाखापेक्षा अधिक लोकांना लागण झालेला आणि तीन लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बीडब्ल्यूएफने आॅलिम्पिक क्वालिफायर्ससह आपल्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित केलेल्या आहेत.

नवी दिल्ली : कोविड-१९ नंतर विश्व बॅडमिंटन महासंघाने जगात या खेळाचे योग्य प्रकारे संचालन करण्यासाठी काही नव्या पद्धतींचा अवलंब करायला पाहिजे आणि एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करायला हवे, अशी सूचना भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी विश्व महासंघाला केली आहे.जगभरात आतापर्यंत ४१ लाखापेक्षा अधिक लोकांना लागण झालेला आणि तीन लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बीडब्ल्यूएफने आॅलिम्पिक क्वालिफायर्ससह आपल्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित केलेल्या आहेत.गोपीचंद म्हणाले, ‘बीडब्ल्यूएफने स्वास्थ्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करायला हवी. स्वरूप बदलायला हवे. स्पर्धेचे फॉर्मेट बदलायला हवे. आवश्यक असलेले सर्व बदल करायला हवे. माझ्या मते जर काही नवे करण्याची गरज असेल तर तसे करा आणि खेळाची आगेकूच कायम राखा.’आंतरराष्ट्रीय सर्किटचा बचाव करण्यासाठी बीडब्ल्यूएफने थॉमस व उबेर कप यासारख्या महत्त्वाच्या स्पर्धा आॅक्टोबरपर्यंत स्थगित केल्या आहेत आणि भारतासह सर्व संबंधित देशांना स्थगित करण्यात आलेल्या आॅलिम्पिक क्वालिफायर्सच्या नव्या तारखा निश्चित करण्यास सांगितले आहे.गोपीचंद म्हणाले, ‘माझी चिंता ही आहे की, तुम्ही तारखा बदलण्याचा प्रयत्न करीत आहात, पण माझ्या मते कदाचित विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. जर असेच होत राहिले तर पूर्ण पथकाला पुन्हा विविध देशांचा प्रवास करावा लागला तर हे खेळाडूंना जोखमीमध्ये टाकण्यासारखे असेल.’बॅडमिंटन खेळाडूंना जवळजवळ प्रत्येक आठवड्यात नव्या स्पर्धेसाठी प्रवास करावा लागतो. गोपीचंद म्हणाले, यात बदल व्हायला हवा. माझ्या मते खेळाडूंना एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धा खेळण्याची संधी मिळायला हवी. भविष्यात हे करणे शक्य आहे.’जागतिक स्वास्थ्य संकट बघता खेळ सुरू करण्यासाठी प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये लढतींचे आयोजन करण्यात येईल. गोपीचंद म्हणाले, ‘प्रेक्षक नसतील तर खेळ टीव्ही व इंटरनेटपर्यंत मर्यादित राहील तर स्पर्धेचे आयोजन तीन वेगवेगळ्या स्थळांवर करण्याला अर्थ उरत नाही. खेळाडूंनाही तीन आठवडे एकाच स्थानावर ठेवता येईल.’ते पुढे म्हणाले, ‘उदाहरण द्यायचे झाल्यास स्पर्धा इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आयोजित करण्याऐवजी या स्पर्धा कुठेही एकाच स्थळावर व्हायला हव्यात. ’ इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरला तीन महत्त्वाच्या आॅलिम्पिक क्वालिफायर्सचे यजमानपद भूषवायचे आहे. या व्यतिरिक्त भारतालाही एका स्पर्धेच्या यजमानपदाची संधी आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintoncorona virusकोरोना वायरस बातम्या