शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: 'सुवर्ण'मने जिंकलेले रौप्यपदक; सिंधू व सायनाचे आभार!

By स्वदेश घाणेकर | Updated: September 3, 2018 11:18 IST

प्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय बॅडमिंटन चमू आशियाई स्पर्धेसाठी जकार्ता येथे दाखल झाला. मागील चार वर्षांतील भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी ध्यानात घेता यंदा आशियाई स्पर्धेत भारत पदकांची लयलूट करेल, असे तर्क होते, तसे झाले नाही. पण जे यश मिळवले त्याचे तेज सुवर्णपदकापेक्षा इतकेच आहे, हेही तितकेच खरे. 

- स्वदेश घाणेकरप्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय बॅडमिंटन चमू आशियाई स्पर्धेसाठी जकार्ता येथे दाखल झाला. मागील चार वर्षांतील भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी ध्यानात घेता यंदा आशियाई स्पर्धेत भारत पदकांची लयलूट करेल, असे तर्क होते, तसे झाले नाही. पण जे यश मिळवले त्याचे तेज सुवर्णपदकापेक्षा इतकेच आहे, हेही तितकेच खरे. 

आशियाई स्पर्धेचा इतिहास पाहता भारताने बॅडमिंटनमध्ये २०१४पर्यंत ८ पदकं जिंकली होती आणि तिही कांस्य... त्यात एकेरीतील एकच पदक होत आणि बाकी दुहेरीत होती. त्यामुळे जकार्तात कांस्यची वेस ओलांडण्याचे आव्हान तर होतेच शिवाय वैयक्तिक कामगिरी उंचावण्याचीही जबाबदारी होती. ती पेलण्यात काही गटांत आपण अपयशी ठरलो. पुरुष गटात किदम्बी श्रीकांतकडून फारच अपेक्षा लावल्या होत्या, पण दुसऱ्या फेरीतच त्याला अपयश आले. एच एस प्रणॉयनेही तोच कित्ता गिरवला. पुरुष दुहेरी, पुरुष सांघिक, महिला दुहेरी, महिला सांघिक आणि मिश्र दुहेरी या सर्व गटांत आपल्याला अपयशाचे तोंड पाहावे लागले. 

इतकी वर्षे सांघिक प्रकारातील एक तरी पदक निश्चित असा इतिहास असूनही बॅडमिंटनपटूंला आलेले अपयश नैराश्यवादी होते. पण, सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या महिला एकेरीतील दिग्गज खेळाडूंनी भारतीयांची निराशा दूर केली. चिनी वर्चस्वाला धक्का देणाऱ्या या भारतीय महिलांनी एकेरीत पदक जिंकले. 1982 नंतर प्रथमच भारतीय बॅडमिंटनपटूंना एकेरीतील पदक जिंकण्यात यश आले. सायनाने कांस्य तर सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी सिंधू ही पहिलीच भारतीय ठरली.. त्यामुळे तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. ते पूर्ण करण्यात ती अपयशी ठरली, परंतु तिच्या या रौप्यकमाईने अनेक 'सुवर्ण'मने जिंकली आहेत. सायना व सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीचा भारतीयांना सार्थ अभिमान आहे. 

सिंधू व सायनाचा वारसा कोणाकडे?आशियाई स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी भारताला यश मिळवून दिले, परंतु चार वर्षांनंतर त्यात सातत्य राखणे हे मोठे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. सायनाचा विचार केला, तर पुढील आशियाई स्पर्धेपर्यंत ती बॅडमिंटनमध्ये सक्रिय राहील की नाही, हा चर्चेचा विषय आहे. सिंधूच्या बाबतीत तसा विचार सध्या नसला तरी 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीवर तिची पुढील वाटचाल अवलंबून आहे. अशा परिस्थित या दोन्ही खेळाडूंचा वारसा पुढे चालवणारी पिढी तयार होणे गरजेचे आहे. तसे झाले तर उत्तम, अन्यथा येरे माझ्या मागल्या... 

चिनी वर्चस्वाला धक्काबॅडमिंटनमध्ये चिनी खेळाडूंची नेहमीच दादागिरी राहिली आहे, परंतु ही आशियाई स्पर्धा त्याला अपवाद ठरली. स्पर्धा इतिहासात प्रथमच पुरुष एकेरीत चिनी खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला. त्याशिवाय 2014च्या तुलनेत त्यांची पदकांची संख्या तीनने कमी झाली. 2014 मध्ये चिनच्या खात्यात 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 9 पदकं होती आणि 2018 मध्ये ती संख्या सहावर ( 3 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्य) आली. 

इंडोनेशियाचे वाढते महत्त्वइंडोनेशियाने 2014च्या तुलनेत यंदा घरच्या प्रेक्षकांसमोर पदक संख्या दुपटीने वाढवली आहे. 2014 मध्ये 2 सुवर्ण व प्रत्येकी 1 रौप्य व कांस्य पदकांसह इंडोनेशियाने एकूण 4 पदकं जिंकली होती. ती 2018 मध्ये 8 झाली आहेत. त्यात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकांचा समावेश आहे.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाPV Sindhuपी. व्ही. सिंधूSaina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton