शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:51 IST

Niti Aayog On EV Sale: जसजसे तंत्रज्ञान जुने होत जाईल तसे ईव्हींच्या किंमती उतरतील असे सांगितले जात होते. परंतू, उलटेच झाले आहे. सबसिडी कमी झाली, कंपन्यांनी किंमती वाढविल्याने ईव्हींच्या किंमती वाढलेल्याच आहेत.

भारतात इलेक्ट्रीक वाहनांची विक्री म्हणावा तसा वेग घेत नाहीय. केंद्र आणि राज्य सरकारने सबसिडी कमी केली असून यामुळे आधीच महाग असलेल्या ईलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती आणखी वाढल्या आहेत. ओलाची जी एस१ प्रो काही वर्षांपूर्वी १.०८ लाखाला ऑनरोड मिळत होती ती आता १.८० लाखावर गेली आहे. असाच फटका मोठ्या वाहनांनाही बसला आहे. 

जसजसे तंत्रज्ञान जुने होत जाईल तसे ईव्हींच्या किंमती उतरतील असे सांगितले जात होते. परंतू, उलटेच झाले आहे. सबसिडी कमी झाली, कंपन्यांनी किंमती वाढविल्याने ईव्हींच्या किंमती वाढलेल्याच आहेत. तरीदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये ईव्ही कारची विक्री ९० टक्क्यांनी वाढलेली आहे. असे असले तरी जेवढी विक्री अभिप्रेत होती तेवढी झालेली नाही, ईव्हीच्या विक्रीचा वेग हवा तेवढा वाढलेला नाही, असे निती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.  

अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनसारख्या देशांपेक्षा भारतात ईव्हीची विक्री मंदावलेलीच आहे. २०२४ मध्ये भारतात जेवढी वाहने विकली गेली, त्यात ईव्हीचा वाटा फक्त ७.६ टक्के आहे. २०३० पर्यंत हा वाटा ३० टक्के करण्याचे लक्ष्य आहे, परंतू पुढील पाच वर्षांत हे लक्ष गाठण्यासाठी तो पुरेसा नाहीय असे निती आयोगाचे म्हणणे आहे. 

भारताने २०१६ मधील ५०,००० युनिट्सवरून २०२४ मध्ये २८ लाख युनिट्सपर्यंत ईव्ही विक्री वाढवली आहे. याच काळात जागतिक बाजारातील ईव्ही विक्री ९.१८ लाखांवरून १.८७ कोटी युनिट्सपर्यंत गेलेली आहे. ३० टक्क्यांचे लक्ष्य गाठायचे असेल तर पुढील ५ वर्षांत ईव्हीचा वाटा २२ टक्क्यांहून अधिक वाढवावा लागणार आहे. 

दुचाकी आणि तीन चाकी ईलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीचा वेग आहे, परंतू कार आणि बस सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची विक्री खुपच मंदावलेली आहे. ट्रकसारख्या लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी ईव्ही घेण्यास सुरुवातही झालेली नाही. कमी किंमतीत कार आहेत, परंतू त्या शहरातच चालविण्याच्या रेंजच्या आहेत. तसेच ज्या जास्त रेंजच्या कार आहेत त्यांची किंमत ही १३-१४ लाखांपासून ते पार ३०-४० लाखांपर्यंत आहे. यामुळे याच श्रेणीतील पेट्रोल, डिझेलच्या कार या यापेक्षा खूप कमी खर्चात मिळतात. यामुळे लोक अजूनही याच कारकडे वळत आहेत. दुसरे कारण म्हणजे चार्जिंगची समस्या आहे. अद्याप म्हणावे तसे चार्जिंग सुविधा विकसित झालेली नाही. यामुळे बाहेरगावी जायचे असेल तर दुसरी कार आणि तिथल्यातिथे शहरात फिरायचे असेल तर ईलेक्ट्रीक कार अशा दोन दोन कार पोसण्याएवढा भारतीय श्रीमंत झालेला नाहीय. याचाही फटका ईव्हीच्या विक्रीला बसत आहे. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर