शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

...तुमचे हेल्मेट कुठे आहे? आता पोलिसांचीच पावती फाडली जातेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 07:58 IST

गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे.

नवी दिल्ली : नव्या वाहतूक नियमांमुळे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. मात्र, पोलिस या नियमांपासून फार आधीपासूनच वेगळे होते. त्यांना विचारणार कोण आणि दंड करणार कोण? जाब विचारल्यास सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा असे प्रकार होत होते. त्यामुळे नको ती कटकट, असे म्हणत वाहतुकीचे नियम पाळण्यातच धन्यता मानली जात होती. पण आता दिवस बदलले आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांच्याही पावत्या फाटू लागल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे. यामुळे आरटीओ, पीयुसी, इन्शुरन्स कंपन्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. अहमदाबाद आणि चंदीगढच्या पोलिस प्रशासनाने तर कायद्याचे रक्षक असलेल्या खात्यातील पोलिसांनाही दणका देण्यास सुरूवात केली आहे. 

बऱ्याचदा रस्त्याने जाताना पोलिस विरुद्ध दिशेने, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालता दुचाकी चालविताना, सीटबेल्ट न लावता कार चालविताना दिसतात. त्यांच्या वाहनांची पीयुसी, इन्शुरन्स, कागदपत्रे आहेत का हे देखील कोणी विचारू शकत नाही. नाक्या नाक्यावर तपासणीसाठी असलेले पोलिसही त्यांच्या ओळखीचे असतात किंवा थांबविल्यास पोलिस असल्याचे सांगितल्याने त्यांना सोडून दिले जाते. यामुळे कायद्याच्या रक्षकांकडूनच कायद्याचे पालन होत नव्हते. सध्या सोशल मिडीयाचा काळ असल्याने याबाबतची खदखद कधी व्हिडीओ, कधी फोटो, कमेंटमधून व्यक्त होत आहे. यामुळे पोलिस प्रशासनानेच याची दखल घेतली आहे. 

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांना धडा शिकविण्यासाठी सध्यातरी अहमदाबाद आणि चंदीगड पोलिसांनी कंबर कसली आहे. तर उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या दोन पोलिसांना वाहतुकीचे नियम तोडल्याबद्दल दंड भरावा लागला आहे. पोलिस अधिक्षक आदित्य वर्मा यांनी सोमवारी सांगितले की, एका पोलिस कॉन्स्टेबलने हेल्मेट घातलेले नव्हते. तर दुसऱ्याकडे हेम्लेट आणि इन्शुरन्सचे पेपरही नव्हते. यामुळे पहिल्याला 500 रुपये आणि दुसऱ्याला 5800 रुपयांचा दंड भरावा लागला. 

सध्या फारच कमी राज्यांनी नवीन नियम लागू केले आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांमध्ये हे नियम लागू झालेले नाहीत. तर गुजरातमध्ये आरटीओकडून सहकार्य मिळाल्यानंतरच नवीन नियम लागू होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने हे नियम सर्व राज्यांना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा