शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तुमचे हेल्मेट कुठे आहे? आता पोलिसांचीच पावती फाडली जातेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 07:58 IST

गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे.

नवी दिल्ली : नव्या वाहतूक नियमांमुळे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. मात्र, पोलिस या नियमांपासून फार आधीपासूनच वेगळे होते. त्यांना विचारणार कोण आणि दंड करणार कोण? जाब विचारल्यास सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा असे प्रकार होत होते. त्यामुळे नको ती कटकट, असे म्हणत वाहतुकीचे नियम पाळण्यातच धन्यता मानली जात होती. पण आता दिवस बदलले आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांच्याही पावत्या फाटू लागल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे. यामुळे आरटीओ, पीयुसी, इन्शुरन्स कंपन्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. अहमदाबाद आणि चंदीगढच्या पोलिस प्रशासनाने तर कायद्याचे रक्षक असलेल्या खात्यातील पोलिसांनाही दणका देण्यास सुरूवात केली आहे. 

बऱ्याचदा रस्त्याने जाताना पोलिस विरुद्ध दिशेने, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालता दुचाकी चालविताना, सीटबेल्ट न लावता कार चालविताना दिसतात. त्यांच्या वाहनांची पीयुसी, इन्शुरन्स, कागदपत्रे आहेत का हे देखील कोणी विचारू शकत नाही. नाक्या नाक्यावर तपासणीसाठी असलेले पोलिसही त्यांच्या ओळखीचे असतात किंवा थांबविल्यास पोलिस असल्याचे सांगितल्याने त्यांना सोडून दिले जाते. यामुळे कायद्याच्या रक्षकांकडूनच कायद्याचे पालन होत नव्हते. सध्या सोशल मिडीयाचा काळ असल्याने याबाबतची खदखद कधी व्हिडीओ, कधी फोटो, कमेंटमधून व्यक्त होत आहे. यामुळे पोलिस प्रशासनानेच याची दखल घेतली आहे. 

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांना धडा शिकविण्यासाठी सध्यातरी अहमदाबाद आणि चंदीगड पोलिसांनी कंबर कसली आहे. तर उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या दोन पोलिसांना वाहतुकीचे नियम तोडल्याबद्दल दंड भरावा लागला आहे. पोलिस अधिक्षक आदित्य वर्मा यांनी सोमवारी सांगितले की, एका पोलिस कॉन्स्टेबलने हेल्मेट घातलेले नव्हते. तर दुसऱ्याकडे हेम्लेट आणि इन्शुरन्सचे पेपरही नव्हते. यामुळे पहिल्याला 500 रुपये आणि दुसऱ्याला 5800 रुपयांचा दंड भरावा लागला. 

सध्या फारच कमी राज्यांनी नवीन नियम लागू केले आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांमध्ये हे नियम लागू झालेले नाहीत. तर गुजरातमध्ये आरटीओकडून सहकार्य मिळाल्यानंतरच नवीन नियम लागू होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने हे नियम सर्व राज्यांना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा