शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

...तुमचे हेल्मेट कुठे आहे? आता पोलिसांचीच पावती फाडली जातेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 07:58 IST

गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे.

नवी दिल्ली : नव्या वाहतूक नियमांमुळे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. मात्र, पोलिस या नियमांपासून फार आधीपासूनच वेगळे होते. त्यांना विचारणार कोण आणि दंड करणार कोण? जाब विचारल्यास सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा असे प्रकार होत होते. त्यामुळे नको ती कटकट, असे म्हणत वाहतुकीचे नियम पाळण्यातच धन्यता मानली जात होती. पण आता दिवस बदलले आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांच्याही पावत्या फाटू लागल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे. यामुळे आरटीओ, पीयुसी, इन्शुरन्स कंपन्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. अहमदाबाद आणि चंदीगढच्या पोलिस प्रशासनाने तर कायद्याचे रक्षक असलेल्या खात्यातील पोलिसांनाही दणका देण्यास सुरूवात केली आहे. 

बऱ्याचदा रस्त्याने जाताना पोलिस विरुद्ध दिशेने, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालता दुचाकी चालविताना, सीटबेल्ट न लावता कार चालविताना दिसतात. त्यांच्या वाहनांची पीयुसी, इन्शुरन्स, कागदपत्रे आहेत का हे देखील कोणी विचारू शकत नाही. नाक्या नाक्यावर तपासणीसाठी असलेले पोलिसही त्यांच्या ओळखीचे असतात किंवा थांबविल्यास पोलिस असल्याचे सांगितल्याने त्यांना सोडून दिले जाते. यामुळे कायद्याच्या रक्षकांकडूनच कायद्याचे पालन होत नव्हते. सध्या सोशल मिडीयाचा काळ असल्याने याबाबतची खदखद कधी व्हिडीओ, कधी फोटो, कमेंटमधून व्यक्त होत आहे. यामुळे पोलिस प्रशासनानेच याची दखल घेतली आहे. 

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांना धडा शिकविण्यासाठी सध्यातरी अहमदाबाद आणि चंदीगड पोलिसांनी कंबर कसली आहे. तर उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या दोन पोलिसांना वाहतुकीचे नियम तोडल्याबद्दल दंड भरावा लागला आहे. पोलिस अधिक्षक आदित्य वर्मा यांनी सोमवारी सांगितले की, एका पोलिस कॉन्स्टेबलने हेल्मेट घातलेले नव्हते. तर दुसऱ्याकडे हेम्लेट आणि इन्शुरन्सचे पेपरही नव्हते. यामुळे पहिल्याला 500 रुपये आणि दुसऱ्याला 5800 रुपयांचा दंड भरावा लागला. 

सध्या फारच कमी राज्यांनी नवीन नियम लागू केले आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांमध्ये हे नियम लागू झालेले नाहीत. तर गुजरातमध्ये आरटीओकडून सहकार्य मिळाल्यानंतरच नवीन नियम लागू होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने हे नियम सर्व राज्यांना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा