शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

नितीन गडकरींनी महाराष्ट्राला काय दिले? रस्ते दुरुस्तीसाठी हजार कोटी आले, कुठे 'गेले'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 19:47 IST

Road Safty, Road repaire : रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाने हा अहवाल जारी केला आहे. यानुसार रस्त्यांच्या डागडुजीसाठी केंद्राने सर्व राज्यांना 7500 कोटी रुपये देण्यात आले होते.

केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांना जवळपास 7000 कोटी रुपये महामार्गांच्या दुरुस्तीसाठी दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे यातील बराच निधी खर्च न केल्याने माघारी गेला आहे. यामुळे खड्डेमय रस्त्यांवरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्ते सुरक्षेचा हा देखील एक महत्वाचा भाग आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या महाराष्ट्रातही शेकडो कोटी परत जाण्याची नामुष्की ओढवली आहे. (ministry of road transport and highways allocate budget of rs 7500 crore to repair the roads in 4 years.)

रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाने हा अहवाल जारी केला आहे. यानुसार रस्त्यांच्या डागडुजीसाठी केंद्राने सर्व राज्यांना 7500 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यापैकी 2017-18 मध्ये 2022 कोटी रुपये देण्यात आले होते. यातील 1600 कोटी रुपये सर्व राज्यांनी मिळून खर्च केले. 2018-19 मध्ये 1822 कोटी रुपये देण्यात आले होते, त्यापैकी 1250 कोटी रुपये खर्च केले. 2019-20 मध्ये 1200 कोटी रुपये देण्यात आले, त्यापैकी 800 कोटी रुपये खर्च झाले. महत्वाचे म्हणजे मागील वर्षीची रक्कम पाहून पैसे दिले ते देखील राज्यांना खर्च करता आलेले नाहीत. 2020-21 मध्ये 2500 रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 1200 कोटी रुपयेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले आहेत. 

गडकरींनी महाराष्ट्राला किती दिले?रस्ते परिवाहन मंत्रालयाचे मंत्री हे महाराष्ट्राचेच नेते नितीन गडकरी आहेत. यामुळे त्यांच्या वजनामुळे महाराष्ट्राला या निधीमध्ये मोठा वाटा मिळाला होता. गेल्या 4 वर्षांत महाराष्ट्राला 1000 कोटी रुपये मिळाले होते. यापैकी 650 कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. म्हणजेच 350 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नाही. महामार्गांवर जागोजागी खड्ड्यांची रांग लागलेली असते. टोल वसुली होते. तरीही टोल सोडताच किंवा त्या आधी १-२ किमी अंतरापासून खड्ड्यांना सुरुवात होते. जर निधीच खर्च होत नसल्यास लोकांचे जीव वाचणार तरी कसे असा प्रश्न पडला आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे केंद्रशासित प्रदेशांनी या निधीपैकी एक रुपयाही खर्च केला नसल्याचे उघड झाले आहे. दादर नगर हवेली, दीव दमनसह चंदीगढसाठी चार कोटी रुपये आले होते. त्यांनी एकही रुपया खर्च केला नाही. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकPotholeखड्डे