शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

स्वस्त ई-बाइक टॅक्सी कोणाला नको?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 10:01 IST

रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येईल का? 

अशोक दातारवाहतूक तज्ज्ञ

नवीन ई- बाइक टॅक्सी धोरण लागू झाले असून, वाहतुकीच्या नवीन व्यवस्थेमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जलद आणि स्वस्त प्रवासाचा आणखी एक चांगला पर्याय त्यामुळे तयार होत आहे. बदलत्या जगासोबत नवीन पर्यायांचा मुंबईकरांना फायदाच होणार आहे, त्यामुळे स्वस्त ई-बाइक टॅक्सी कोणाला नको, असा प्रश्न वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला.

ई-बाइक टॅक्सी सेवेबद्दल तुमचे मत काय ?

उत्तर : मुंबईसारख्या वाहतूक कोंडी असलेल्या शहरांसाठी ई-बाइक टॅक्सी हा एक उत्तम पर्याय आहे. रिक्षा आणि टॅक्सीचालक अनेकदा भाडे नाकारतात. या सेवेतून प्रवाशांना वाहतुकीसाठी स्वस्त आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. ई-बाइक टॅक्सीमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येईल का? 

उत्तर : कोणतीही नवीन व्यवस्था इतरांना अडथळा न करता रोजगार निर्माण करत असेल तर तिला विरोध करण्याची गरज नाही. खासगी आणि सरकारी क्षेत्रांप्रमाणेच सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातही नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ई-बाइक टॅक्सीमुळे अनेक तरुणांना आणि रिक्षा/ टॅक्सीचालकांच्या मुलांनाही रोजगाराची संधी मिळू शकते.

या सेवेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल का? 

उत्तर : ई-बाइक टॅक्सी आकाराने लहान असल्याने ती कमी जागा व्यापते. त्यामुळे तिचा वापर वाढला तर शहरातील गर्दी नक्कीच कमी होईल. यासोबत खासगी वाहनविक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहने उभी केली जातात, यावर नियंत्रण हवे. सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित केल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होईल. यासाठी ऑटो रिक्षा संघटनांनी ई-बाइक टॅक्सीला विरोध करण्याऐवजी सरकारवर सक्षम वाहतूक धोरण राबविण्यासाठी दबाव आणायला हवा.

ही सेवेच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेतली जाते... 

उत्तर : प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नियम बनवले जातील. रिक्षा आणि टॅक्सीमध्येही क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जाते. तेव्हा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत नाही का? जागतिक पातळीवर ई-बाइकसारखे पर्याय निवडलेले असताना आपण संकुचित राहण्यापेक्षा त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे. कमी/जास्त भाड्याबाबत माझा आक्षेप नाही, तो त्यांचा हक्क आहे. वाहतूक क्षमतेनुसार भाडे ठरवलेले असते. टॅक्सीतून ४ प्रवासी, रिक्षातून ३, तर ई-बाइक टॅक्सीमधून केवळ १ प्रवासी. त्यामुळे एका प्रवाशाला टॅक्सीने जाताना तीन प्रवाशांचे भाडे द्यावे लागते. ई- बाइक टॅक्सीमुळे पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे.

टियर-२ शहरांत ई-बाइक टॅक्सीची गरज आहे का? 

हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे. सरकारने अभ्यासपूर्वक काही निर्णय घेतले आहेत. बाइक टॅक्सी सुरू तरी होऊ देत. जर नसल्याचे दिसले तर साहजिकच ती बंद होईल. त्यामुळे गरज आहे की नाही हे या टप्प्यावर ठरविणे चुकीचे ठरेल.

- शब्दांकन : महेश कोले, प्रतिनिधी

टॅग्स :Mumbaiमुंबई