शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले
2
"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 
3
पाकिस्तानी खेळाडूने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा केला अपमान, निवृत्तीबद्दल केलं 'हे' विधान
4
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे हाफिज सईदच्या मुलाला भरली धडकी! म्हणतोय "मला सोडा,मी काहीच केलं नाहीये..."
6
Homeguard Bharti: होमगार्ड भरतीसाठी फिजिकल टेस्ट देताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, पाकिस्तान...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला थेट इशारा
8
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
9
अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?
10
Astro Tips: व्यवसाय करावासा वाटतोय, पण जमेल का ही मनात शंका? २० सेकंदात मिळेल उत्तर!
11
Swami Samartha: स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर आधी 'हे' नियम वाचा!
12
ऑफिसमधील महिला पतीला म्हणाली 'बेबी', ऐकताच हायपर झाली पत्नी! भर सोसायटीत हाय व्हॉल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ
13
आरबीआयची 'आर्थिक' ताकद वाढली! सोन्याचा साठा विक्रमी पातळीवर, बँकेच्या तिजोरीत काय-काय आहे?
14
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
15
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
16
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
17
IND vs AUS मालिकेचे वेळापत्रक BCCIने केलं जाहीर, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रंगणार 'रनसंग्राम'
18
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
19
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
20
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...

स्वस्त ई-बाइक टॅक्सी कोणाला नको?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 10:01 IST

रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येईल का? 

अशोक दातारवाहतूक तज्ज्ञ

नवीन ई- बाइक टॅक्सी धोरण लागू झाले असून, वाहतुकीच्या नवीन व्यवस्थेमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जलद आणि स्वस्त प्रवासाचा आणखी एक चांगला पर्याय त्यामुळे तयार होत आहे. बदलत्या जगासोबत नवीन पर्यायांचा मुंबईकरांना फायदाच होणार आहे, त्यामुळे स्वस्त ई-बाइक टॅक्सी कोणाला नको, असा प्रश्न वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला.

ई-बाइक टॅक्सी सेवेबद्दल तुमचे मत काय ?

उत्तर : मुंबईसारख्या वाहतूक कोंडी असलेल्या शहरांसाठी ई-बाइक टॅक्सी हा एक उत्तम पर्याय आहे. रिक्षा आणि टॅक्सीचालक अनेकदा भाडे नाकारतात. या सेवेतून प्रवाशांना वाहतुकीसाठी स्वस्त आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. ई-बाइक टॅक्सीमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येईल का? 

उत्तर : कोणतीही नवीन व्यवस्था इतरांना अडथळा न करता रोजगार निर्माण करत असेल तर तिला विरोध करण्याची गरज नाही. खासगी आणि सरकारी क्षेत्रांप्रमाणेच सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातही नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ई-बाइक टॅक्सीमुळे अनेक तरुणांना आणि रिक्षा/ टॅक्सीचालकांच्या मुलांनाही रोजगाराची संधी मिळू शकते.

या सेवेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल का? 

उत्तर : ई-बाइक टॅक्सी आकाराने लहान असल्याने ती कमी जागा व्यापते. त्यामुळे तिचा वापर वाढला तर शहरातील गर्दी नक्कीच कमी होईल. यासोबत खासगी वाहनविक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहने उभी केली जातात, यावर नियंत्रण हवे. सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित केल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होईल. यासाठी ऑटो रिक्षा संघटनांनी ई-बाइक टॅक्सीला विरोध करण्याऐवजी सरकारवर सक्षम वाहतूक धोरण राबविण्यासाठी दबाव आणायला हवा.

ही सेवेच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेतली जाते... 

उत्तर : प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नियम बनवले जातील. रिक्षा आणि टॅक्सीमध्येही क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जाते. तेव्हा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत नाही का? जागतिक पातळीवर ई-बाइकसारखे पर्याय निवडलेले असताना आपण संकुचित राहण्यापेक्षा त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे. कमी/जास्त भाड्याबाबत माझा आक्षेप नाही, तो त्यांचा हक्क आहे. वाहतूक क्षमतेनुसार भाडे ठरवलेले असते. टॅक्सीतून ४ प्रवासी, रिक्षातून ३, तर ई-बाइक टॅक्सीमधून केवळ १ प्रवासी. त्यामुळे एका प्रवाशाला टॅक्सीने जाताना तीन प्रवाशांचे भाडे द्यावे लागते. ई- बाइक टॅक्सीमुळे पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे.

टियर-२ शहरांत ई-बाइक टॅक्सीची गरज आहे का? 

हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे. सरकारने अभ्यासपूर्वक काही निर्णय घेतले आहेत. बाइक टॅक्सी सुरू तरी होऊ देत. जर नसल्याचे दिसले तर साहजिकच ती बंद होईल. त्यामुळे गरज आहे की नाही हे या टप्प्यावर ठरविणे चुकीचे ठरेल.

- शब्दांकन : महेश कोले, प्रतिनिधी

टॅग्स :Mumbaiमुंबई