शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नितिन गडकरींच्या एका निर्णयाने हजारोंचे प्राण वाचले; महाराष्ट्र अद्याप दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 08:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ़त्वाखालील सरकारने पुन्हा निवडून आल्यावर काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये महाराष्ट्राचे खासदार नितिन गडकरी यांचे मोठे वजन आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ़त्वाखालील सरकारने पुन्हा निवडून आल्यावर काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये महाराष्ट्राचे खासदार नितिन गडकरी यांचे मोठे वजन आहे. गडकरींचे रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकताच नवा मोटार वाहन कायदा लागू केला आहे. लोकसभा आणि राज्यसभेतही हा कायदा मंजूर करून घेत नियमांमध्ये रुपांतर केले आहे. गडकरींनी तेव्हा या कायद्यामुळे लोकांमध्ये वाहतूक नियमांना घेऊन गंभीरता लक्षात येईल असे म्हटले होते. 

नवा मोटार वाहन कायदा लोकांमध्ये दहशत पसरविणारा ठरला आहे. याचे मूळ कारण म्हणजे मागील कायद्याच्या तुलनेत दहा पटींनी वाढविलेला दंड आहे. हा कायदा लागू झाल्यापासून कोणाला 15 हजार, तर कोणाला 50 हजार तर कोणाला चक्क 6 लाखांचा दंड केल्याच्या घटनांनी चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. हे खरे आहे की हा कायदा अद्याप काही राज्यांमध्ये लागू झालेला नसून त्यात गडकरींचा महाराष्ट्रही आहे. हा कायदा लागू झाला तेव्हा महाराष्ट्रात निवडणुकांचे वातावरण होते. यामुळे लोकांच्या नाराजीची झळ नको म्हणून निवडणुकीनंतर नियम लागू करण्याचा विचार करण्यात आला आहे. यामुळे येत्या महिनाभरात हा नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. तसेच काही राज्यांनी दंडाची रक्कम कमी करून कायदा लागू केला आहे. 

असे असले तरीही नितिन गडकरींच्या या निर्णयाने हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. ही आकडेवारीच खुद्द नितिन गडकरी यांनी लोकसभेत दिली आहे. मोटार वाहन कायदा 2019 वर गडकरींना सांगितले की सप्टेंबर-ऑक्टोबर 2019 रस्ते अपघातात एकूण 1355 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या वर्षी याच काळात 1503 लोकांनी प्राण गमावले होते. या नियमामुळे मृत्यूंची संख्या 9.8 टक्क्यांनी कमी झाली आहे. 

गुजरातमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे. या काळात 480 लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. तर गेल्या वर्षी या काळात 557 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच 13.8 टक्क्यांनी मृत्यू घटले आहेत. गुरुवारी लोकसभेचे सीपीआयचे खासदार एम सेल्वराज यांनी य़ाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातlok sabhaलोकसभाroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक