शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

इलेक्ट्रिक वाहनांची नुसतीच पोकळ ‘हवा’; रिपोर्टमधून इको फ्रेंडली नसल्याचं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 05:36 IST

लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. हे इलेक्ट्रॉन अगदी सहज सोडतात. यामुळे हे ईव्ही बॅटरीमध्ये वापरले जाते

इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला वाटतात तितक्या पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली नसल्याचे समोर आले आहे. एका अहवालानुसार, एक इलेक्ट्रिक कारसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल जमिनीतून काढताना ४,२७५ किलो ॲसिड कचरा आणि किरणोत्सर्गी अवशेष तयार होतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेच फायद्याची आहेत का हे जाणून घेऊ...

इलेक्ट्रिक वाहनांमुळे काय होते नुकसान? ईव्हीमध्ये १३,५०० लिटर पाणी लागते, तर पेट्रोलमध्ये जवळपास ४ हजार लिटर पाणी असते. जर ईव्हीला कोळशावर चालणाऱ्या विजेवर चार्ज करून १.५ लाख किमी चालवल्यास पेट्रोल कारपेक्षा केवळ २० टक्के कमी कार्बन निर्माण होईल. भारतात ७० टक्के वीज कोळशापासून निर्माण होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या संशोधनानुसार ३३०० टन लिथियम कचऱ्यापैकी केवळ २ टक्के पुनर्वापर केला जातो, तर ९८ टक्के प्रदूषण पसरवते. 

जमिनीला कसा बसतो फटका? लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. हे इलेक्ट्रॉन अगदी सहज सोडतात. यामुळे हे ईव्ही बॅटरीमध्ये वापरले जाते. लिथियमचा पर्यावरणपूरक म्हणून गौरव केला जातो; परंतु ते जमिनीतून काढून टाकणे पर्यावरणासाठी ३ पट जास्त विषारी आहे. 

सर्व गाड्या ईव्ही झाल्या तर प्रदूषण कमी होईल? संशोधकांच्या मते, जगात सुमारे २०० कोटी वाहने आहेत. यातील केवळ १ कोटी वाहने इलेक्ट्रिक आहेत. जर सर्व वाहने ईव्हीमध्ये रूपांतरित केली तर त्या गाड्या तयार करण्यासाठी जाणाऱ्या ॲसिड कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसी साधने नाहीत. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक वाढवून आणि खासगी गाड्या कमी करूनच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करता येईल.

भारताचे लक्ष्य? २०३० पर्यंत ७० टक्के व्यावसायिक कार, ३० टक्के खासगी कार, ४० टक्के दुचाकी आणि ८० टक्के तीन चाकी वाहनांचे विद्युतीकरण करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्याचवेळी २०३० पर्यंत ४४.७ टक्के वीज अक्षय ऊर्जेपासून तयार केली जाईल, आता ती २१.२६ टक्के आहे.

लोकांना कशाची चिंता? 

चार्जिंग स्टेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, सुरक्षेची काळजी, कमी पर्याय, ब्रँडची उपलब्धता

 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कार