शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

Indian Army: टाटाने लष्कराला नेक्सॉनपेक्षाही सेफ कार दिली! बुलेटप्रुफ, बॉम्ब फोडा नाहीतर भूसुरुंगाने उडवा, फरक पडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:58 IST

ज्या कंपनीने भारताला पहिली आणि सर्वाधिक सुरक्षित कार दिली त्या टाटा कंपनीने ही वाहने बनविली आहेत.

भारतीय सैन्य आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगपेक्षाही सेफ कारमधून कारवाया करणार आहे. पुलवामा सारख्या हल्ल्यात भारताचे जवान शहीद होतात. अशा घटनांना यापुढे चाप बसणार आहे. कारण स्वदेशी बनावटीच्या चिलखती गाड्या आता सैन्याच्या दिमतीला असणार आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे ज्या कंपनीने भारताला पहिली आणि सर्वाधिक सुरक्षित कार दिली त्या टाटा कंपनीने ही वाहने बनविली आहेत. या गाडीचे नाव क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम (Quick Reaction Fighting Vehicle Medium - QRFV) असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती वाहनांपेक्षा जास्त वेगाने जातात. 

या चिलखती वाहनाला असॉल्ट रायफलच्या गोळ्याच काय बॉम्ब आणि भूसुरुंगही भेदू शकणार नाहीत, एवढ्या मजबूत बनविण्यात आल्या आहेत. हे चिलखती वाहन टाटा एडव्हान्स सिस्टम लिमिटेड (TASL) ने बनविले आहे. या वाहनाच्या खाली भूसुरुंग जरी फुटला तरी त्याला काही होणार नाही, एवढे हे मजबूत वाहन आहे.

काही दिवसांपूर्वी दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये या चिलखती वाहनाचा पहिल्यांदाच वापर झाला होता. स्वदेशी आर्मर्ड कॉम्बॅट ही दोन वाहने सुदानला पाठविण्यात आली होती. दक्षिण सुदानला पाठवलेल्या आर्मर्ड कॉम्बॅट व्हेइकल्समध्ये QRFV M4 आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स आणि TATA Xenon लाइट व्हेइकल्स होते. या वाहनांमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. सैनिक या वाहनांमध्ये सुरक्षित असणार आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTataटाटा