शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री कमी कमी होऊ लागली; हे कारण आले समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:26 IST

प्रदुषणामुळे वैतागलेल्या दिल्लीकरांना ईव्हीकडे वळविण्यासाठी सबसिडी आणि टॅक्समाफीची खैरात देण्यात आली. याचे अनुकरण कमी अधिक प्रमाणात इतर राज्यांनीही केले.

देशाची राजधानी दिल्लीला इलेक्ट्रीक वाहनांची राजधानी बनवायचे होते. प्रदुषणामुळे वैतागलेल्या दिल्लीकरांना ईव्हीकडे वळविण्यासाठी सबसिडी आणि टॅक्समाफीची खैरात देण्यात आली. याचे अनुकरण कमी अधिक प्रमाणात इतर राज्यांनीही केले. आता ईव्ही वाहनांच्या विक्रीने पुरेसा वेग पकडल्याचे सांगून केंद्राने आणि नंतर राज्याने दिल्लीत सबसिडी कमी करण्यास सुरुवात केली. पण हेच मुळावर आले आहे. 

सबसिडी कमी झाल्याने लोकांना पदरचे पैसे घालून ईव्ही वाहन खरेदी करावे लागत आहे. ईव्ही वाहनांच्या कटकटी पाहता लोक या वाहनांकडे पाठ फिरवू लागले आहेत. ईव्ही वाहनांच्या विक्रीचा चढता आलेख आता घसरू लागल्याची आकडेवारी आली आहे. एप्रिल ते ऑगस्टमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहनांचे रजिस्ट्रेशन दोन हजार वाहनांनी कमी झाले आहे. 

हीच री आता इतर राज्यांतही ओढली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानेही सबसिडी बंद केली आहे. केवळ आरटीओ चार्जेस नाममात्र ठेवण्यात आले आहेत. यामुळे या राज्यांतही ईव्ही वाहनांचा खप कमी कमी होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. गेल्याच महिन्यात ज्या लोकांनी ईव्ही वाहने घेतली त्यांच्यापैकी बहुतांश लोकांना ती पुन्हा घ्यायची इच्छा राहिलेली नाही, असा रिपोर्ट आला होता. 

त्यातच मारुतीसारखा तगडा गडी काही केल्या ईव्हीमध्ये उतरलेला नाहीय. टाटा एकामागोमाग एक ईव्ही वाहने लाँच करत सुटली आहे. मारुती हायब्रिड वाहनांच्या टोयोटाच्या तंत्रज्ञानाकडे डोळे लावून बसली आहे. एका बड्या कंपनीने हायड्रोजन इंजिनमधील समस्याच दूर करून टाकली आहे. यामुळे ही कंपनी ईव्ही आणायचे सोडून हायड्रोजनवरील कार देखील आणू शकते. ईव्हीसाठी बॅटरीचा खर्च खूप आहे, यामुळे इतर कंपन्याही पर्यायी इंधनांच्या शोधात आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर