शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

राज्यात दीड वर्षात ९,३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 05:52 IST

केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार, राज्य सरकारने गेल्या वर्षी महाराष्ट्राचे ‘इलेक्ट्रिक व्हेइकल प्रोत्साहन धोरण’ जाहीर केले होते. गेल्या दीड वर्षांत राज्यात ९,३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती मोटार वाहन विभागाने दिली.इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळावे, म्हणून राज्य शासनाने या धोरणात वाहनधारकांसाठी रस्ता कर माफ केला होता. मात्र, सप्टेंबरपासून रस्ता करात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. १ एप्रिल, २०१८ ते २४ सप्टेंबर, १९ पर्यंत ९,३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या दुचाकींची आहे. एकूण ७,१६९ दुचाकींची, तर १,७०८ तीन चाकी वाहनांची नोंदणी झाली असून, उर्वरित वाहनांमध्ये ३४६ चारचाकी व ९३ मोठ्या वाहनांचा समावेश आहे.‘इलेक्ट्रिक व्हेइकल प्रोत्साहन धोरण’अंतर्गत ई-वाहने आणि त्यांच्या सुट्या भागांचे उत्पादन आणि जास्तीतजास्त ई-वाहनांचा वापर करणारे स्पर्धात्मक राज्य बनविणे, जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांचे पसंतीचे ठिकाण म्हणून राज्य विकसित करून आर्थिक आकर्षणाचे केंद्र बनविणे, राज्यातील ई-वाहनांची संख्या पाच लाखांपर्यंत वाढविणे आणि एक लाख रोजगारांची निर्मिती करणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती.>१,७०८ तीन चाकी वाहनेराज्य सरकारने गेल्या वर्षी महाराष्ट्राचे ‘इलेक्ट्रिक व्हेइकल प्रोत्साहन धोरण’ जाहीर केले. इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यानुसार, १ एप्रिल, २०१८ ते २४ सप्टेंबर, १९ पर्यंत ९,३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या ७,१६९ एवढी दुचाकींची नोंदणी झाली आहे. त्यापाठोपाठ १,७०८ तीन चाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. उर्वरित वाहनांमध्ये ३४६ चारचाकी व ९३ मोठी वाहने आहेत.