शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

राज्यात दीड वर्षात ९,३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 05:52 IST

केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार, राज्य सरकारने गेल्या वर्षी महाराष्ट्राचे ‘इलेक्ट्रिक व्हेइकल प्रोत्साहन धोरण’ जाहीर केले होते. गेल्या दीड वर्षांत राज्यात ९,३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती मोटार वाहन विभागाने दिली.इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळावे, म्हणून राज्य शासनाने या धोरणात वाहनधारकांसाठी रस्ता कर माफ केला होता. मात्र, सप्टेंबरपासून रस्ता करात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. १ एप्रिल, २०१८ ते २४ सप्टेंबर, १९ पर्यंत ९,३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या दुचाकींची आहे. एकूण ७,१६९ दुचाकींची, तर १,७०८ तीन चाकी वाहनांची नोंदणी झाली असून, उर्वरित वाहनांमध्ये ३४६ चारचाकी व ९३ मोठ्या वाहनांचा समावेश आहे.‘इलेक्ट्रिक व्हेइकल प्रोत्साहन धोरण’अंतर्गत ई-वाहने आणि त्यांच्या सुट्या भागांचे उत्पादन आणि जास्तीतजास्त ई-वाहनांचा वापर करणारे स्पर्धात्मक राज्य बनविणे, जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांचे पसंतीचे ठिकाण म्हणून राज्य विकसित करून आर्थिक आकर्षणाचे केंद्र बनविणे, राज्यातील ई-वाहनांची संख्या पाच लाखांपर्यंत वाढविणे आणि एक लाख रोजगारांची निर्मिती करणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती.>१,७०८ तीन चाकी वाहनेराज्य सरकारने गेल्या वर्षी महाराष्ट्राचे ‘इलेक्ट्रिक व्हेइकल प्रोत्साहन धोरण’ जाहीर केले. इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यानुसार, १ एप्रिल, २०१८ ते २४ सप्टेंबर, १९ पर्यंत ९,३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या ७,१६९ एवढी दुचाकींची नोंदणी झाली आहे. त्यापाठोपाठ १,७०८ तीन चाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. उर्वरित वाहनांमध्ये ३४६ चारचाकी व ९३ मोठी वाहने आहेत.