शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

स्वस्तातल्या कारसाठी ग्राहकांची सुरक्षा धोक्यात? कंपन्या मात्र नफ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 10:19 IST

केवळ एक एअरबॅग असलेली कार लाखांमध्ये विकली जाते.

नवी दिल्ली : भारतात सुरक्षेपेक्षा जास्त मायलेज देणारी कार खूप लोकप्रिय होते. यामुळे कार कंपन्याही स्वस्तात मस्त कार बनवून त्या पाण्यासारख्या विकत आहेत. यामुळे रस्ते अपघातात लाखो लोकांचे बळी, जायबंदी होत आहेत. याला कारणीभूत केवळ कार कंपन्या नसून सरकारही तेवढेच आहे. 

केवळ एक एअरबॅग असलेली कार लाखांमध्ये विकली जाते. कंपन्या लाखो रुपये घेऊन काही हजारात असलेली आणखी एक एअरबॅग का देत नाहीत, असाच मनात विचार येतो. यामागे सरकार आहे. सरकारनेच कमीतकमी एक एअरबॅग असलेल्या गाड्या विकण्याची परवानगी दिली आहे. याचा नियमाचा फायदा कंपन्याही उचलत आहेत. यामुऴे चालकाला एअरबॅग असली तरीही त्याच्या बाजुला बसलेल्या व्यक्तीला ही सुरक्षा मिळत नाही. यामुळे अपघातावेळी त्या व्यक्तीला दुखापत किंवा जीव जातो. 

रस्ते वाहतूक मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी वाहनांच्या सुरक्षेसाठी जो प्रस्ताव तयार केला होता त्यामध्ये कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, नंतर हा प्रस्ताव बदलण्यात आला किंवा ती ओळच काढून टाकली गेली. धक्कदायक म्हणजे स्पीड अलर्ट सिस्टिम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट रिमाईंडरसारखे कमी किंमतीचे फिचर्स आता येणाऱ्या कारमध्ये अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र, पुढील सीटवरील प्रवाशाला एअरबॅग सक्तीची करण्यात आलेली नाही. 

29 ऑगस्ट 2017 मध्ये या सुधारणा विधेयकाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. यामध्ये 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या कारमध्ये अतिरिक्त सुरक्षा फिचर्स देणे गरजेचे करण्यात आले आहे. नव्या लाँच झालेल्या कारमधील तीन कार अशा आहेत ज्यांच्यामध्ये एकच एअरबॅग आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, लकरच एआयएस कोडमध्ये सुधारणा करण्यात येईल, यामध्ये नव्या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. 

टॅग्स :carकारroad safetyरस्ते सुरक्षा