शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

फास्टॅग नाही, सॅटेलाइटने होणार टोलवसुली; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 06:03 IST

नाक्याची गरज संपणार; टोल भरावाच लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात टोलवसुलीसाठी फास्टॅगला नवीन पर्याय लवकरच येणार आहे. वाहनाच्या नंबर प्लेटवरून सॅटेलाइटवर आधारित टोलवसुलीची प्रक्रिया देशात सुरू करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये चालत्या वाहनांकडून सॅटेलाइटद्वारे टोल वसुली केली जाणार असून, त्यासाठी फास्टॅगची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये नितीन गडकरी यांनी माहिती देताना सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टोलवसुलीत सुधारणा करण्यास पूर्ण वाव आहे. यातून ना कोणी टोल चोरू शकतो ना कोणाला वाचवता येणार आहे. आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही.

कधी सुरू होणार? हे नवे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. त्यानंतर सहा महिन्यांत ही प्रणाली देशात लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे टोल नाका बनविण्याची गरज नसून, टोल दिल्याशिवाय प्रवास करणे अशक्य आहे. यातून जे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा होईल, असे गडकरी म्हणाले.

वाहनांची ओळख कशी पटणार?गडकरी म्हणाले की वाहन उत्पादकांना वाहनांमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे टोल वसुली सुलभ होईल आणि लोकांनाही दिलासा मिळेल. 

फायदा नेमका कुणाला मिळणार? सध्या एखादी व्यक्ती १० किमीचा टोल रस्ता वापरते, परंतु त्याला ७५ किमीसाठी टोल भरावा लागतो, परंतु जीपीआरएस आधारित टोल वसुलीप्रक्रिया सुरू झाल्यावर जेथून वाहन टोलमध्ये प्रवेश करेल आणि जेव्हा ते बाहेर पडेल तेव्हापर्यंतचा टोल आकारला जाईल. यामुळे टोलीही बचत होणार आहे.

भारत अमेरिकेलाही टाकणार मागेदेशात २६ ग्रीन एक्स्प्रेस हायवे बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. २०२४पर्यंत देशातील हे २६ ग्रीन एक्स्प्रेस हायवे सुरू झाल्यानंतर भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या पुढे जाईल, असे गडकरी म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे कोणतीही आर्थिक टंचाई नसल्याचे ते म्हणाले.

फास्टॅग असतानाही रोखीने टोलदेशात वाहनांमध्ये टोलवसुली करण्यासाठी फास्टॅग बसवूनही वसुली पूर्ण होत नसल्याचेही गडकरी म्हणाले. सध्या त्यातून दररोज १२० कोटी रुपये वसूल केले जात आहेत. ९७ टक्के लोक हा फास्टॅगचा वापर करत आहेत. मात्र फक्त ६७ टक्के लोकच याद्वारे टोल भरतात. बाकीचे लोक दुप्पट टोल रोख रक्कम देत भरत आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाका