शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

फास्टॅग नाही, सॅटेलाइटने होणार टोलवसुली; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 06:03 IST

नाक्याची गरज संपणार; टोल भरावाच लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात टोलवसुलीसाठी फास्टॅगला नवीन पर्याय लवकरच येणार आहे. वाहनाच्या नंबर प्लेटवरून सॅटेलाइटवर आधारित टोलवसुलीची प्रक्रिया देशात सुरू करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये चालत्या वाहनांकडून सॅटेलाइटद्वारे टोल वसुली केली जाणार असून, त्यासाठी फास्टॅगची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये नितीन गडकरी यांनी माहिती देताना सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टोलवसुलीत सुधारणा करण्यास पूर्ण वाव आहे. यातून ना कोणी टोल चोरू शकतो ना कोणाला वाचवता येणार आहे. आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही.

कधी सुरू होणार? हे नवे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. त्यानंतर सहा महिन्यांत ही प्रणाली देशात लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे टोल नाका बनविण्याची गरज नसून, टोल दिल्याशिवाय प्रवास करणे अशक्य आहे. यातून जे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा होईल, असे गडकरी म्हणाले.

वाहनांची ओळख कशी पटणार?गडकरी म्हणाले की वाहन उत्पादकांना वाहनांमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे टोल वसुली सुलभ होईल आणि लोकांनाही दिलासा मिळेल. 

फायदा नेमका कुणाला मिळणार? सध्या एखादी व्यक्ती १० किमीचा टोल रस्ता वापरते, परंतु त्याला ७५ किमीसाठी टोल भरावा लागतो, परंतु जीपीआरएस आधारित टोल वसुलीप्रक्रिया सुरू झाल्यावर जेथून वाहन टोलमध्ये प्रवेश करेल आणि जेव्हा ते बाहेर पडेल तेव्हापर्यंतचा टोल आकारला जाईल. यामुळे टोलीही बचत होणार आहे.

भारत अमेरिकेलाही टाकणार मागेदेशात २६ ग्रीन एक्स्प्रेस हायवे बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. २०२४पर्यंत देशातील हे २६ ग्रीन एक्स्प्रेस हायवे सुरू झाल्यानंतर भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या पुढे जाईल, असे गडकरी म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे कोणतीही आर्थिक टंचाई नसल्याचे ते म्हणाले.

फास्टॅग असतानाही रोखीने टोलदेशात वाहनांमध्ये टोलवसुली करण्यासाठी फास्टॅग बसवूनही वसुली पूर्ण होत नसल्याचेही गडकरी म्हणाले. सध्या त्यातून दररोज १२० कोटी रुपये वसूल केले जात आहेत. ९७ टक्के लोक हा फास्टॅगचा वापर करत आहेत. मात्र फक्त ६७ टक्के लोकच याद्वारे टोल भरतात. बाकीचे लोक दुप्पट टोल रोख रक्कम देत भरत आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाका