शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

हेल्मेटसाठीचे नियम बदलणार; उच्च प्रतीची आयात हेल्मेट हद्दपार होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:34 IST

या हेल्मेटच्या गुणवत्तेसाठी त्यामध्ये उच्च प्रतीचे साहित्य वापरले जाते. यामुळे त्यांचे वजन वाढते. वजन वाढल्याने मानदुखी सारखे विकारही उद्भवतात.

भारतात दुचाकी अपघातांची संख्या मोठी आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडण्य़ाची संख्याही अधिकच. यामुळे सरकारने वेळोवेळी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांना न पटल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे हेल्मेट वापरण्य़ाकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच कमी किंमतीतील रस्त्यावर मिळणारी बनावट हेल्मेट वापरण्यात येतात. यामुळे सरकारने आता उच्च क्वालिटीच्या हेल्मेट नियमावलीच बदलण्याची तयारी केली आहे. या नव्या हेल्मेटचे वजन 1.5 किलोवरून 1.2 किलोपेक्षा कमी असणार आहे. 

या हेल्मेटच्या गुणवत्तेसाठी त्यामध्ये उच्च प्रतीचे साहित्य वापरले जाते. यामुळे त्यांचे वजन वाढते. वजन वाढल्याने मानदुखी सारखे विकारही उद्भवतात. सरकारच्या या निर्णयामुळे बाहेरच्या देशातून भारतात हेल्मेट आयात करणाऱ्या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही हॅल्मेट जगभरातील देशांचे नियम पाळून बनविलेली असतात. अमेरिका, युरोपमधील नियम हे भारतापेक्षा कडक आहेत. मात्र, या हेल्मेटचे वजन हे 1.2 किलो पेक्षा जास्तच असते. यामुळे ही हॅल्मेट आयएसआय स्टँडर्डमधून बाहेर पडणार आहेत. याचा तोटा कंपन्यांच्या विक्रीवर होणार आहे. 

तसेच या कंपन्यांना आणखी एक समस्या भेडसावत आहे. गेल्यावर्षी रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या आदेशामध्ये आयएसआय मार्क नसलेली हॅल्मेट विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे म्हटले आहे. यामुळे परदेशी हॅल्मेट्सना अडचण निर्माण झालेली आहे. वजनाच्या अटीबाहेर जात असल्याने ही हॅल्मेट आयएसआय मार्कसाठी योग्य नाहीत. यामुळे जरीही ही हॅल्मेट उच्च प्रतीची असली तरीही ती भारतात वापरण्यासाठी बेकायदेशीर ठरणार आहेत. 

जर सरकारने अशा प्रकारच्या हॅल्मेटसाठी वेगळी तरतूद केली तर ते या कंपन्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. ही नवीन नियमावली आली की उच्च प्रतीच्या हेल्मेट बीआयएस प्रमाणपत्राला पात्र ठरविली जातील.

टॅग्स :motercycleमोटारसायकलroad safetyरस्ते सुरक्षा