शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आता वाहनांच्या नंबर प्लेटवर लावावी लागणार चमकदार टेप, अन्यथा आकारला जाणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 10:25 IST

रस्त्यावर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता केंद्र सरकार लवकरच मोठं पाऊल उचलू शकतं.

नवी दिल्लीः रस्त्यावर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता केंद्र सरकार लवकरच मोठं पाऊल उचलू शकतं. प्रस्तावित नव्या नियमानुसार आता गाड्यांच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप(चमकदार टेप) लावणं अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता आहे. जर कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर चमकदार टेप लावलेली नसल्यास त्यावर दंड आकारलं जाणार आहे. रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी सरकारनं या निर्णयाची पुढील आठवड्यात अंमलबजावणी करणार असल्याची चर्चा आहे. नंबर प्लेट चमकल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांच्या ड्रायव्हरला पुढे गाडी असल्याचं समजतं. मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहनांमध्ये चमकदार टेप लावण्यासाठी या आठवड्यात अधिसूचना जारी करू शकते. रेट्रोसंदर्भात मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांन सांगितलं की, सडक सुरक्षेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे. काय आहे नियम?नियमानुसार, ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षामध्ये पुढे सफेद रंग आणि पाठीमागे लाल रंगाची चमकदार टेप लावणं गरजेचं आहे. या टेपची रुंदी 20 मिमीहून कमी असू नये. जर गाडी 25 किमी प्रतितासाच्या वेगानं धावत असल्यास रेट्रोची चमकदार टेप 50 मीटर दूरवरूनच दिसली पाहिजे. पहिल्यांदा ई-रिक्षाला या नियमात सूट दिलेली आहे. आता रस्ते अपघातात ई-रिक्षांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारनं हा निर्णय घेतला आहे. रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.