शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

जुन्या कारची विल्हेवाट लावल्यानंतरच नवी कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:44 IST

दिल्लीत वाहतूक व्यवस्थापनाच्या संदर्भात संसदीय समितीची शिफारस

नवी दिल्ली : जुन्या व निकामी झालेल्या चारचाकीची विल्हेवाट लावल्याशिवाय नव्या गाडीची नोंदणी करता येणार नाही, असा नियम करण्याची शिफारस दिल्लीतील वाहतूक व्यवस्थापनाच्या संदर्भात संसदीय समितीने केली आहे. या शिफारशीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरीही अद्याप यातील निकष पुढे आलेले नाही.

दिल्लीतील वाहतूक कोंडी हा सरकारपुढील एक मोठा प्रश्न आहे. दिल्ली सरकार व केंद्र सरकारही त्यावर सातत्याने उपाययोजना करीत आले. पण, तरीही हा प्रश्न सुटत नाही. त्यावर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या नेतृत्वातील ३१ सदस्यांच्या संसदीय समितीने काही शिफारसी केल्या आहेत.

‘दिल्लीतील वाहतूक व्यवस्था बदलण्याचे व्यवस्थापन’ या शिर्षकाखाली हा अहवाल अलीकडेच राज्यसभेत सादर करण्यात आला. त्यामुळे कोंडी दूर करण्याचे मोठे आव्हान पुन्हा एकदा सरकारपुढे उभे झाले. प्रदूषणावरील उपाययोजना म्हणून दिल्ली सरकारने ‘सम-विषम’ लागू केले होते. त्यामुळे काही प्रमामात दिल्लीतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर झाली होती. मात्र, वाहतूक कोंडीवरील हा कायमस्वरुपी उपाय नसल्यामुळे नवे पर्याय शोधले जात आहेत. समितीने चारचाकीचा विमा वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी निश्चित केलेल्या दंडाशी जोडण्याची शिफारसही केली आहे. जे नियमित वाहतूक नियम मोडतात त्यांच्याकडून अधिक जास्त प्रिमीयम वसूल करावा, असे समितीने म्हटले आहे.

या भागांमध्ये सर्वाधिक समस्या

दिल्लीतील कनॉट प्लेस, लाजपतनगर, नेहरू प्लेस, भिकाजी प्लेस, करोल बाग, विकास मार्ग, कमला नगर मार्केट आणि कृष्णानगर मार्केट येथे वाहतूक कोंडीची सर्वाधिक समस्या आहे, असे संसदीय समितीने म्हटले आहे.

पार्किंगसाठी जागा असेल तरच नोंदणी

यामध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा असल्याचे सिद्ध केले तरच नव्या चारचाकीची नोंदणी करण्याची परवानगी असेल, अशी अट घालण्याची शिफारसही करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये दररोज सरासरी १४०० वाहनांची नोंदणी होते. गेल्या चार महिन्यांमध्ये वाहन उद्योगात मंदी आल्यामुळे काही प्रमाणात यात घट झाली होती. पण, महागाईच्या झळा असतानाही पुन्हा एकदा वाहन खरेदीत वाढ झाली.

टॅग्स :carकारParkingपार्किंगpollutionप्रदूषणTrafficवाहतूक कोंडी