शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

जुन्या कारची विल्हेवाट लावल्यानंतरच नवी कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:44 IST

दिल्लीत वाहतूक व्यवस्थापनाच्या संदर्भात संसदीय समितीची शिफारस

नवी दिल्ली : जुन्या व निकामी झालेल्या चारचाकीची विल्हेवाट लावल्याशिवाय नव्या गाडीची नोंदणी करता येणार नाही, असा नियम करण्याची शिफारस दिल्लीतील वाहतूक व्यवस्थापनाच्या संदर्भात संसदीय समितीने केली आहे. या शिफारशीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरीही अद्याप यातील निकष पुढे आलेले नाही.

दिल्लीतील वाहतूक कोंडी हा सरकारपुढील एक मोठा प्रश्न आहे. दिल्ली सरकार व केंद्र सरकारही त्यावर सातत्याने उपाययोजना करीत आले. पण, तरीही हा प्रश्न सुटत नाही. त्यावर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या नेतृत्वातील ३१ सदस्यांच्या संसदीय समितीने काही शिफारसी केल्या आहेत.

‘दिल्लीतील वाहतूक व्यवस्था बदलण्याचे व्यवस्थापन’ या शिर्षकाखाली हा अहवाल अलीकडेच राज्यसभेत सादर करण्यात आला. त्यामुळे कोंडी दूर करण्याचे मोठे आव्हान पुन्हा एकदा सरकारपुढे उभे झाले. प्रदूषणावरील उपाययोजना म्हणून दिल्ली सरकारने ‘सम-विषम’ लागू केले होते. त्यामुळे काही प्रमामात दिल्लीतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर झाली होती. मात्र, वाहतूक कोंडीवरील हा कायमस्वरुपी उपाय नसल्यामुळे नवे पर्याय शोधले जात आहेत. समितीने चारचाकीचा विमा वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी निश्चित केलेल्या दंडाशी जोडण्याची शिफारसही केली आहे. जे नियमित वाहतूक नियम मोडतात त्यांच्याकडून अधिक जास्त प्रिमीयम वसूल करावा, असे समितीने म्हटले आहे.

या भागांमध्ये सर्वाधिक समस्या

दिल्लीतील कनॉट प्लेस, लाजपतनगर, नेहरू प्लेस, भिकाजी प्लेस, करोल बाग, विकास मार्ग, कमला नगर मार्केट आणि कृष्णानगर मार्केट येथे वाहतूक कोंडीची सर्वाधिक समस्या आहे, असे संसदीय समितीने म्हटले आहे.

पार्किंगसाठी जागा असेल तरच नोंदणी

यामध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा असल्याचे सिद्ध केले तरच नव्या चारचाकीची नोंदणी करण्याची परवानगी असेल, अशी अट घालण्याची शिफारसही करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये दररोज सरासरी १४०० वाहनांची नोंदणी होते. गेल्या चार महिन्यांमध्ये वाहन उद्योगात मंदी आल्यामुळे काही प्रमाणात यात घट झाली होती. पण, महागाईच्या झळा असतानाही पुन्हा एकदा वाहन खरेदीत वाढ झाली.

टॅग्स :carकारParkingपार्किंगpollutionप्रदूषणTrafficवाहतूक कोंडी