शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅश गार्ड हे चालकाच्या नव्हे तर इंजिनच्या संरक्षणासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 08:00 IST

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅशगार्ड हे मोटारसायकलीला अपघातामध्ये काही प्रसंगामधून संरक्षित करते, इंजिनाला किमान धक्का बसेल अशी ती रचना असते.

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅशगार्ड हे मोटारसायकलीला अपघातामध्ये काही प्रसंगामधून संरक्षित करते, इंजिनाला किमान धक्का बसेल अशी ती रचना असते. मात्र ते चालकाच्या पायाच्या संरक्षणाचा भाग नाही.मोटारसायकलींचे प्रमाण आज चांगलेच वाढले आहे. मोटारसायकलीला स्कूटरसारखी बाहेरून झाकणारी वा संरक्षण देणारी काही विशिष्ट रचना नसते.मात्र विविध प्रकारचे लोखंजी, स्टीलचे गार्ड्स या मोटारसायकलींसाठी बाजारात मिळतात. सर्वच प्रकारचे हे गार्डस वा रॉड हे प्रत्येक मोटारसायकलीला लावलेले असतात असे नाही. मात्र काही महत्त्वाचे गार्ड्स हे मोटारसायकलीसाठी आवश्यक असतात. मोटारसायकलीचे अपघातामध्ये वा अगदी स्टॅण्डवरून पडतानाही काही महत्त्वाच्या भागाचे संरक्षण व्हावे यासाठी अशा प्रकारचे संरक्षक गार्ड्स वा रॉडद्वारे तयार केलेली एक रचना गरजेची असते. त्यामधील एक म्हणजे फ्रंट क्रॅश गार्ड.हे गार्ड नेमके कशासाठी असते, असा प्रश्न अनेकांना पडतो, काहींना वाटते, पायाला त्यामुळे संरक्षण मिळते, अपघाताच्यावेळी पुढे क्रॅश गार्ड असल्याने काही आपटण्यापासून पायाला संरक्षण मिळते, असेही वाटते. मात्र शास्त्रीयदृष्ट्या तसे नाही. क्रॅशगार्ड हे अपघातामध्ये वा अतिमोठ्या खड्ड्यामध्ये मोटारसायकल आपटली गेली व त्यामुळे मोटारसाकलच्या पुढे असलेल्या इंजिन व संलग्न भागाला नुकसान होऊ नये, यासाठी लावण्याची पद्धत आहे. ते ही विशिष्ट आकाराचे असते. काहीवेळा स्टाइल म्हणून एक आडवा सिंगल बार लावला जातो, अशा प्रकारच्या सिंगल बारला क्रॅशगार्ड म्हणता येत नाही. अपघाताच्यावेळी चालकाच्या पायाला, गुडघ्याला, घोट्याला संरक्षण मिळावे, समतोल साधण्यासाठी त्यावर पाय ठेवता यावा, अशा संरक्षणात्मक कामासाठी हे प्रभावी साधन नव्हे हे पहिले लक्षात ठेवायला हवे. यामुळेच मोटारसायकल घेतल्यानंतर त्या मोटारसायकलीला कोणत्या पद्धतीचे क्रॅशगार्ड लावायचे, कोणत्या ाकाराचे लावायचे याचा पूर्ण विचार करूनच ते लावावे. फॅशन वा स्टाइल म्हणून नव्हे.साधारणपणे क्रॅशगार्डमुळे मोठ्या अपघाताच्यावेळी चालक फेकला गेल्यास क्रॅशगार्डमध्ये पाय अटकण्याचा संभव नसतो. मात्र फार वेग नसताना मोटारसायकल जमिनीवर घासत गेली तर किंवा अिधक वेग असतानाही ती एका बाजूला पडली व घासत गेली तर क्रॅशगार्डमुळे मोटारसायकलीच्या इंजिनाच्या भागाला धक्का कमी बसतो, कारण या गार्डमुळे जमिनीमध्ये व इंजिनामध्ये एक गॅप तयार होते. जमिनीपासून इंजिन काही अंतरावर राहाते. अर्थात त्यामुळे पाय अडकण्याचा संभव असू शकतो, त्यावेळी पायाला या गार्डपासून काही संरक्षम मिळत नाही उलट त्रास होतो. पाय अडकणे, घसरण थांबल्यानंतर बाहेर पडायला त्रास होणे अशा प्रकाराने अपघातापासून होणारी शारीरीक इजा होणारच. पायाचा गुडघा व अँकल, तसेच हाडाचा भाग यासाठी स्वतंत्र वेगळे गार्ड असते. अर्थात ते वापरण्याची भारतात पद्धतच नसते. इतके सामान कोण घेणार, ते ठेवणार कुठे हा प्रश्न असतो. हेलमेटही नाकारणारा भारतीय मानसिकतेचा भाग विचारात घेतला तर हे लक्षात येऊ शकेल. मात्र एक खरे की मोटारसायकलीला असणारे क्रॅशगार्ड प्रामुख्याने इंजिन व मोटारसायकलीचे काही भाग याचे बर्याच प्रमाणात संरक्षण करू शकते, अर्थात ते सारे अपघातात कोणत्या प्रकारे मोटारसायकल असते, त्यावरच अवलंबून आहे.