शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

महिंद्रा मराझो बनली भारतातील सर्वात सुरक्षित MPV

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 14:10 IST

भारतीय कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करू लागल्याचे दिसत आहे.

मुंबई: महिंद्राने नुकतीच लाँच केलेली MPV कार मराझोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार मिळाले असून ती भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार बनली आहे. या यशामुळे भारतीय कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करू लागल्याचे दिसत आहे. नुकतीच टाटाच्या नेक्सॉन या कारला 5 स्टार मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून टाटा नेक्सॉनला शुभेच्छा दिल्या आहेत. 

भारतातील ग्राहकांची मानसिकता सुरक्षेपेक्षा मायलेज किती देते याकडे असल्याने मारुती सुझुकीसह काही कंपन्या सुरक्षेकडे लक्ष पुरवत नव्हते. मात्र, लोकांमध्ये जागृती होऊ लागल्याने आणि भारतासाठी 2014 पासून ग्लोबल NCAP ने क्रॅश टेस्ट सुरु केल्याने कंपन्याही आता हळूहळू सुरक्षेकडे लक्ष देऊ लागल्या आहेत. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता हे एक चांगले पाऊल आहे. 

महिंद्राने गेल्या महिन्यातच मराझो ही कार लाँच केली होती. या कारमध्ये एबीएस, ड्युअल एअरबॅगसह ड्रायव्हर आणि पुढील प्रवाशासाठी सीटबेल्ट रिमायंडर स्टँडर्ड देण्यात आले आहे. या कारमध्ये ग्रील, टेललाईट आणि शार्कफिन अँटेना यामधून शॉर्क माशाची प्रतिकृती यामध्ये पाहायला मिळते. कारमध्ये प्रोजेक्टर लेंस हेडलँप्स, एलईडी फॉगलँप, एलईडी डीआरएल, डायमंड कट अलॉय व्हील्स सारखे फिचर देण्यात आले आहेत. 

 

महिंद्राने या कारला चार व्हेरिअंट्समध्ये लाँच केले असून M2, M4, M6, M8 आणि 6 रंगात कार उपलब्ध केली आहे. कारमध्ये 7 इंचाची इन्फोटेन्मेंट सिसि्टम देण्यात आली आहे. याशिवाय व्हॉईस कंट्रोल आणि क्रूज कंट्रोल फिचरही देण्यात आले आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकार