शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Mahindra: महिंद्राच्या या वाहनांच्या फ्युअल पाईपमध्ये मोठा दोष; तब्बल 30000 गाड्या मागे बोलावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:58 IST

Mahindra recall: फेब्रुवारीमध्ये कंपनीने आपली थार एसयुव्हीच्या डिझेल व्हेरिअंटला रिकॉल केले होते. १५७७ युनिट्स माघारी बोलविण्यात आले होते. या वाहनांच्या इंजिनच्या भागात सदोष कॅमशेफ्ट लावला गेला होता. तो बदलण्यात आला.

एसयुव्ही, माल वाहतुकीच्या छोट्या गाड्यांची प्रमुख वाहन निर्माता कंपनी Mahindra and Mahindra (महिंद्रा अँड महिंद्रा) ने मंगळवारी खराब असेम्ब्लीच्या शंकेमुळे फ्ल्यूअल पाईप बदलण्यासाठी आपली पिकअप वाहने रिकॉल केली आहेत. येत्या काळात 29,878 वाहने माघारी बोलावण्यात आली आहेत. (Mahindra to recall nearly 30,000 pickup trucks due to fluid pipe issue.)

दिल बडा होना चाहिए! एथरने दुसऱ्या कंपन्यांच्या इ-स्कूटरसाठी फास्ट चार्जरचा पेटंटच खुला केला

महिंद्राने म्हटले की, कंपनीने असेंब्लीमध्ये शंका असल्याने जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2020 मध्ये बनविण्यात आलेल्या काही पिकअप गाड्यांच्या फ्युएल पाईपचे निरीक्षण करण्यासाठी आणि बदलण्यासाठी माघारी बोलविल्या आहेत. 

Video: आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय! कंपनीची वर्षानुवर्षाची ओळख 'पुसणार'; लोगो बदलणार

निरीक्षण आणि दुरुस्ती मोफत केली जाणार आहे. या गाड्यांच्या मालकांना डीलरशिपकडून व्यक्तीगतरित्या फोन केले जातील. आपल्या ग्राहकांसाठी त्रासमुक्त अनुभव देण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या प्रमुखांनी सांगितले. 

Anand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद

गेल्या महिन्यात कंपनीने नाशिकच्या फॅक्टरीमध्ये बनलेल्या काही वाहनांच्या डिझेल इंजिनांचे सक्रीय निरीक्षण आणि बदलण्याची घोषणा केली होती. फॅक्टरीतील दुषित इंधनामुळे स्पेअर पार्ट लवकर खराब होण्याची शक्यता होती. कंपनीने केलेला हा रिकॉल 21 जून आणि 2 जुलै 2021 दरम्यान बनलेल्या 600 वाहनांसाठी होता. तर फेब्रुवारीमध्ये कंपनीने आपली थार एसयुव्हीच्या डिझेल व्हेरिअंटला रिकॉल केले होते. १५७७ युनिट्स माघारी बोलविण्यात आले होते. या वाहनांच्या इंजिनच्या भागात सदोष कॅमशेफ्ट लावला गेला होता. तो बदलण्यात आला.

टॅग्स :Mahindraमहिंद्रा