शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

इंजिन ऑइल व फिल्टर योग्यवेळी बदलणे अतिशय गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 16:33 IST

इंजिन ऑइल हे इंजिनाच्या कामामधील अतिशय मोलाचे काम करणारे तेल आहे. त्या तेलाच्या जास्तीतजास्त प्रभावी वापराबरोबरच ते अधिक काळ नीट राहावे यासाठी फिल्टरही महत्त्वाचा असतो. हा फिल्टर व तेल यांची सुयोग्य देखभाल, बदल हाच कारच्या चांगल्या आयुष्याचा मार्ग असतो.

ठळक मुद्देइंजिन ऑइलमधून खराब पार्टिकल्स काढून टाकणे व तेल स्वच्छ ठेवणे हे काम हा फिल्टर करतोइंजिनातील तेल फिल्टर होणार नसेल तर ते तेल खराब होईल व त्यामुळे साहजिकच इंजिनाच्या क्षमतेवर परिणाम होईलकार उत्पादक साधारण ५ ते ६ हजार किलोमीटर इतक्या रनिंगनंतर हा फिल्टर बदलण्याची शिफारस करीत असतात

तेलाचा वापर हा कारच्या इंजिनाच्यादृष्टीने अतिशय मोलाचा व महत्त्वाचा आहे. वास्तविक कच्चा तेलापासून पेट्रोल व डिझेल तयार केले जाते. याच कच्चा तेलापासून तयार केलेले तेल इंजिन, ब्रेक अॉइल म्हणूनही वापरले जाते. इंजिनामधील अतिशय मोलाच्या कामगिरीत तेलाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. अशा या तेलाचा वापर होत असताना ते तेल चांगले मिळाले पाहिजे, कारण हे तेल इंजिनामध्ये असणाऱ्या बारीक घटकांना आपल्याबरोबर घेत असते. इंजिनाच्या कार्यामध्ये त्यात असलेल्या येणारे पार्टिक्लस तेलामध्ये मिक्स होत असतात. यासाठीच हे ते गाळले जाणे गरजेचे असते. यामध्ये ऑइल फिल्टर तेलासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावतो.  

इंजिनामध्ये तेल हे अतिशय मोलाची कामगिरी करीत असते. ज्याला आपण इंजिन ऑइल म्हणतो ते हे तेल इंिजनाला थंड करीत असते. उष्णता प्रसरणापासून हे तेल इंजिन थंड करण्याचे काम करीत असते. पिस्टन रिंग्ज व सिलिंडर वॉल यांच्यामध्ये असणारी गॅप वा पोकळी भरून काढली जाते ती या तेलामुळे तसेच त्या इंजिनामध्यी प्रक्रियेत तयार होणाऱ्या पार्टिकल्स वा सूक्ष्म अशा कचऱ्याला तेलात सामावल्यानंतर त्याचा इंजिनावर परिणाम होत असतो. त्यामुळे इंजिनामधील तेल हे गाळले जाणे गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला तेल सतत बदलावे लागेल. ते काम नक्कीच खर्चिक असेल. यासाठीच ऑइल फिल्टर अतिशय मोठी कामगिरी बजावीत असतो. कारमध्ये या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व म्हणूनच तसे अनन्यसाधाण म्हणावे लागते. 

इंजिन ऑइलमधून खराब पार्टिकल्स काढून टाकणे व तेल स्वच्छ ठेवणे हे काम हा फिल्टर करतो. इंजिनातील तेल फिल्टर होणार नसेल तर ते तेल खराब होईल व त्यामुळे साहजिकच इंजिनाच्या क्षमतेवर परिणाम होईल. हा फिल्टर कायम तोच वापरायचा नसतो. त्याला काही ठरावीक कालमर्यादा असते. त्या अनुषंगाने कार उत्पादक साधारण ५ ते ६ हजार किलोमीटर इतक्या रनिंगनंतर हा फिल्टर बदलण्याची शिफारस करीत असतात. काहींच्या मते ज्यावेळी हे तेल ५ ते ६ हजार किलोमीटर नंतर बदलावे लागते, तेव्हाच हा फिल्टरही बदलावा अशीही काही शिफारस केली जाते. मुळात तेल काय किंवा हा फिल्टर काय वेळच्यावेळी त्या घटकांना बदलणे हे महत्त्वाचे असते. तुमच्या ड्रायव्हिंग स्थितीवर, वाहन कोणत्या भागात वापरले जाते त्या ठिकाणांवरही ऑइल व अन्य बाबींच्या देखभालीच्या व बदलाच्या काळात फरक पडत असतो. 

आज सिंथेटीक तेलही इंजिनामध्ये वापरले जाते व ते ही चांगले असल्याची अनेकांची माहिती आहे, तसा अनुभव आहे. अर्थात हे प्रत्येक वापरकर्त्यांवर अवलंबून आहे. मुळात इंजिन, ब्रेक, आदी कारमध्ये आवश्यक असणारी तेल योग्य काळामध्ये वापरणे व बदलणे जसे गरजेचे आहे तसेच त्या तेलाच्या जास्तीतजास्त उपयोगासाठी फिल्टरसारख्या महत्त्वाच्या बाबीही योग्य पद्धतीने वापरणे व बदलणे गरजेचे आहे. शेवटी कार वा वाहन हे एक यंत्र आहे व त्याची देखभाल नीट केली गेली नाही, तर साहजिकच मोठा फटका वापरकर्त्यांच्या खिशालाही बसू शकतो.

टॅग्स :Automobileवाहनcarकार