शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

अपघात झाल्या झाल्या गोल्डन अवर खूप महत्वाचा; जखमी वाचतच नाही तर लवकर बराही होतो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:50 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार रस्ते अपघातात उपचार वेळेत मिळाले तर मृतांची संख्या निम्म्याने कमी केली जाऊ शकते.

दरवर्षीचा अपघाताचा आकडा आणि अपघाती मृत्यूंचा आकडा वाढतच चालला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वेळेवर उपचार न मिळणे हे आहे. अगदीच महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत महत्वाच्या व्यक्तींचा अपघात झाला होता. मेटे, मिस्त्री या राजकारणी आणि उद्योगपतींना जीव गमवावा लागला होता. पैकी मेटे यांना कित्येक तास मदत मिळाली नव्हती. यामुळे त्यांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केला होता. अपघातानंतर जमखीला वाचविण्यासाठी पहिला तास हा गोल्डन अवर असतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

अपघात झाल्या झाल्या जखमीला पहिल्या तासात योग्य उपचार मिळाले तर तो वाचतच नाही तर लवकर रिकव्हर होतो, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्ती मृत्यूशी झुंझत असतो. जीवन आणि मृत्यूच्या मध्येच असताना त्याला योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. फ्रान्सच्या सैन्याने पहिल्या विश्वयुद्धावेळी याचा प्रयोग केला होता. अपघातानंतर पहिला तास यासाठी महत्वाचा असल्याचे मानले गेले आहे. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार रस्ते अपघातात उपचार वेळेत मिळाले तर मृतांची संख्या निम्म्याने कमी केली जाऊ शकते. अपघात झाल्यावर जखमीच्या शरीरातून रक्त जाऊ लागते. जेवढा वेळ लागेल तेवढे जास्तीचे रक्त वाया जाते व त्याच्या जिवाला धोका वाढतो. यामुळे जेवढे शक्य तेवढे लवकर उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचविला जाऊ शकतो. 

काही वर्षांपूर्वी रस्ते अपघात झाला तर कोणी मदत करण्यास पुढे येत नव्हते. कारण कायद्यानुसार जो मदत करेल त्यालाच पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकवत होते. या कटकटीमुळे कोणी अपघातग्रस्तांना मदत करत नव्हते. आता सरकारने कायदा बदलून मदत करणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत, अशी सोय केली आहे. यामुळे थोडीफार मदत होत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात