शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अपघात झाल्या झाल्या गोल्डन अवर खूप महत्वाचा; जखमी वाचतच नाही तर लवकर बराही होतो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:50 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार रस्ते अपघातात उपचार वेळेत मिळाले तर मृतांची संख्या निम्म्याने कमी केली जाऊ शकते.

दरवर्षीचा अपघाताचा आकडा आणि अपघाती मृत्यूंचा आकडा वाढतच चालला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वेळेवर उपचार न मिळणे हे आहे. अगदीच महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत महत्वाच्या व्यक्तींचा अपघात झाला होता. मेटे, मिस्त्री या राजकारणी आणि उद्योगपतींना जीव गमवावा लागला होता. पैकी मेटे यांना कित्येक तास मदत मिळाली नव्हती. यामुळे त्यांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केला होता. अपघातानंतर जमखीला वाचविण्यासाठी पहिला तास हा गोल्डन अवर असतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

अपघात झाल्या झाल्या जखमीला पहिल्या तासात योग्य उपचार मिळाले तर तो वाचतच नाही तर लवकर रिकव्हर होतो, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्ती मृत्यूशी झुंझत असतो. जीवन आणि मृत्यूच्या मध्येच असताना त्याला योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. फ्रान्सच्या सैन्याने पहिल्या विश्वयुद्धावेळी याचा प्रयोग केला होता. अपघातानंतर पहिला तास यासाठी महत्वाचा असल्याचे मानले गेले आहे. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार रस्ते अपघातात उपचार वेळेत मिळाले तर मृतांची संख्या निम्म्याने कमी केली जाऊ शकते. अपघात झाल्यावर जखमीच्या शरीरातून रक्त जाऊ लागते. जेवढा वेळ लागेल तेवढे जास्तीचे रक्त वाया जाते व त्याच्या जिवाला धोका वाढतो. यामुळे जेवढे शक्य तेवढे लवकर उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचविला जाऊ शकतो. 

काही वर्षांपूर्वी रस्ते अपघात झाला तर कोणी मदत करण्यास पुढे येत नव्हते. कारण कायद्यानुसार जो मदत करेल त्यालाच पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकवत होते. या कटकटीमुळे कोणी अपघातग्रस्तांना मदत करत नव्हते. आता सरकारने कायदा बदलून मदत करणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत, अशी सोय केली आहे. यामुळे थोडीफार मदत होत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात