शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपघात झाल्या झाल्या गोल्डन अवर खूप महत्वाचा; जखमी वाचतच नाही तर लवकर बराही होतो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:50 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार रस्ते अपघातात उपचार वेळेत मिळाले तर मृतांची संख्या निम्म्याने कमी केली जाऊ शकते.

दरवर्षीचा अपघाताचा आकडा आणि अपघाती मृत्यूंचा आकडा वाढतच चालला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वेळेवर उपचार न मिळणे हे आहे. अगदीच महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत महत्वाच्या व्यक्तींचा अपघात झाला होता. मेटे, मिस्त्री या राजकारणी आणि उद्योगपतींना जीव गमवावा लागला होता. पैकी मेटे यांना कित्येक तास मदत मिळाली नव्हती. यामुळे त्यांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केला होता. अपघातानंतर जमखीला वाचविण्यासाठी पहिला तास हा गोल्डन अवर असतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

अपघात झाल्या झाल्या जखमीला पहिल्या तासात योग्य उपचार मिळाले तर तो वाचतच नाही तर लवकर रिकव्हर होतो, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्ती मृत्यूशी झुंझत असतो. जीवन आणि मृत्यूच्या मध्येच असताना त्याला योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. फ्रान्सच्या सैन्याने पहिल्या विश्वयुद्धावेळी याचा प्रयोग केला होता. अपघातानंतर पहिला तास यासाठी महत्वाचा असल्याचे मानले गेले आहे. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार रस्ते अपघातात उपचार वेळेत मिळाले तर मृतांची संख्या निम्म्याने कमी केली जाऊ शकते. अपघात झाल्यावर जखमीच्या शरीरातून रक्त जाऊ लागते. जेवढा वेळ लागेल तेवढे जास्तीचे रक्त वाया जाते व त्याच्या जिवाला धोका वाढतो. यामुळे जेवढे शक्य तेवढे लवकर उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचविला जाऊ शकतो. 

काही वर्षांपूर्वी रस्ते अपघात झाला तर कोणी मदत करण्यास पुढे येत नव्हते. कारण कायद्यानुसार जो मदत करेल त्यालाच पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकवत होते. या कटकटीमुळे कोणी अपघातग्रस्तांना मदत करत नव्हते. आता सरकारने कायदा बदलून मदत करणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत, अशी सोय केली आहे. यामुळे थोडीफार मदत होत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात