शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांचा मान राखलाच गेला पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 21:19 IST

वाहतूक पोलीस हा मोठ्या शहरांमधील वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा कणा असून त्यांचा मान राखणे, त्यांना सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत असताना दिसत आहेत. काही भारतीय नागरिकांकडून अशा प्रकारचे निर्लज्ज, बेजबाबदार व हिंसक वर्तन होणे ही अतिशय चिंताजनक बाब म्हणावी लागते. कायद्यानुसार अशा वर्तनामध्ये पकडण्यात आलेल्यांना योग्य ती सजा होत असतेही, पण मुळात अशा प्रकारचे वर्तन हे असंस्कृत आहे व ते रोखले गेले पाहिजे. याला कारण आहे ती कायदा न जुमानण्याची व नियम धाब्यावर बसवण्याची मानसिकता. राजकीय वा समाजधुरिणांकडूनही काहीवेळा विविध स्तरावर वा अन्य क्षेत्रातही असे वर्तन होत असते, त्यामुळे सर्वसाधारण नागरिकही अशा प्रकारच्या मानसिकतेला आपल्यामध्ये सामावून घेऊ पाहाता. वाहतूक पोलीस ही यंत्रणा आज काही म्हटले तरीही एका चाकोरीमध्ये, ठरवून दिलेल्या दिशेमध्ये काम करणारी आहे. शहरामधील वाहतूक कोंडीमध्ये सतत उभे राहून, वाहतूक नियमन करणे हे शारीरीक दृष्टीनेही अनेक त्रास देणारे आहे. पण वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल वा अधिकाऱ्यांच्या कर्तव्यामध्ये या गोष्टी स्वीकार्य होतात, त्यांचे नियमितपणे तेथे असणारे काम व त्यातही आपल्या वैयक्तिक त्रासालाही स्वीकारून नेमाने वाहतूक नियमन करमे हे सोपे नाही.समाजावर होत असणारे हे एक प्रकारचे उपकारच आहेत, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेण्याची गरज आहे. स्वतः वाहतूक नियम तोडायचे व वर अरेरावी दाखवीत एकंदर पोलीस खात्यामधील भ्रष्टाचाराला प्रत्येकवेळी सर्व पोलीस कर्मचाऱ्यामध्ये पाहायचे हा देखील नागरिकांकडून केला जाणारा प्रकार अतिशय निंदनीय आहे.काही काळापूर्वी एका अल्पवयीन मुलाने मुंबईत वांद्रे येथे वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर अतिशय अमानवी हल्ला केला , त्यात शिंदे यांचा झालेला मृत्यू ही बाब सर्वांच्यादृष्टीने अतिशय शरमेची आहे. मुळात वाहतूक पोलीस ज्या परिस्थितीत काम करतात, ज्या शारीररीक समस्यांना, मानसिक दबावांमध्ये काम करतात, ज्या तणावामध्ये काम करतात ते पाहिले तर नक्कीच त्यांचे कौतुक करण्यासारखेच नव्हे तर त्यांचा मान राखून त्यांच्याशी प्रत्येक नागरिकाने वर्तन केले पाहिजे. वाहतूक नियमन करीत उन्हा पावसात काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सर्व प्रथम एक माणूस म्हणूनही पाहाण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यात सरकार, लोकप्रतिनिधी यांनीही तसे वर्तन करायला हवे.मुंबई, पुणे, ठाणे, महाराष्ट्रातील अनेक शहरे व महामार्ग या ठिकाणी या वाहतूक पोलिसांची कामे ही त्यांना मिळणाऱ्या वेतन, सुविधा व कामाचे तास या तुलनेत खूप मोठी आहेत.प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम पाळणे, त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवायला पोलिसांना स्वतःहून मदत करणे, ते जमत नसले तर किमान त्या पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य करणे हे वाहनांच्या चालक व मालक या दोघांच्यादृष्टीने गरजेचे आहे. हे वाहतूक पोलीस आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी, सुलभ वाहतुकीसाठी काम करीत असतात, हे लक्षात ठेवून वाहतूक पोलिसांचा योग्य तो सन्मान राखणे हे अतिशय महत्त्वाचे व उत्तम नागरिकत्त्वाचे लक्षण आहे.

टॅग्स :Policeपोलिस