शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

Electric Scooters : इलेक्ट्रीक स्कूटर्स लाँच करण्यावर खरंच सरकारनं बंदी घातली का? पाहा काय आहे सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:59 IST

गेल्या काही दिवसांमध्ये देशात इलेक्ट्रीक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात इलेक्ट्रीक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. यानंतर सरकारदेखील अॅक्शनमोडमध्ये आलं होतं आणि एक समितीही स्थापन करण्याचे निर्देश दिले होतं. परंतु त्यानंतर आता काही माध्यमांकडून सरकारन इलेक्ट्रीक दुचाकींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना नव्या गाड्या लाँच न करण्याचे निर्देश दिल्याचं सांगण्यात आलं होतं. सरकारनं आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सरकारनं अशाप्रकारचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्ट केलंय.

इलेक्ट्रीक दुचाकींमध्ये आग लागण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारनं उत्पादकांना नव्या इलेक्ट्रीक दुचाकी लाँच न करण्याचा, तसंच ज्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये आग लागल्याची घटना घडली नाही, त्यांनीदेखील नव्या दुचाकी लाँच न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. यावर सरकारनं स्पष्टीकरण देत हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. ‘इलेक्ट्रीक दुचाकींना लागलेल्या आगीची चौकशी होईपर्यंत कोणत्याही कंपनीनं इलेक्ट्रीक दुचाकी लाँच करू नये असे आदेश सरकारनं दिल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. अशा प्रकारचे कोणतेही निर्देश सरकारकडून देण्यात आले नसून हे वृत्त दिशाभूल करणारं आणि निराधार आहे,’ असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. सरकारनं ट्विटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलंय.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरGovernmentसरकार