शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास चार पटीनं वाढतो अपघाताचा धोका- रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 12:22 IST

रस्त्यावर गाडी चालवताना मोबाइल वापरल्यास अपघाताचा धोका वाढतो, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटने(WHO)नं दिला आहे.

नवी दिल्लीः रस्त्यावर गाडी चालवताना मोबाइल वापरल्यास अपघाताचा धोका वाढतो, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटने(WHO)नं दिला आहे. रिपोर्टनुसार, जर आपण गाडी चालवताय आणि त्याच वेळी मोबाइल वापरल्यास अपघाताचा धोका चार पटीनं वाढतो. डब्लूएचओनुसार, जे वाहनचालक गाडी चालवताना मोबाइल वापरत नाहीत, त्यांना अपघाताचा धोका कमी असतो. परंतु गाडी चालवत असताना मेसेज टाइप करत असतात, त्यांना अपघात होण्याची शक्यता अधिक असते. कारण मेसेज टाइप करताना आपली नजर रस्त्यावरून मोबाइल स्क्रीनकडे वळते आणि रस्त्याचा अंदाज न आल्यानं गाडीवरील ताबा सुटतो.रिपोर्टनुसार, गाडी चालवत असताना मेसेज टाइप केल्यास व्यक्ती प्रत्येक 6 सेकंदांमध्ये 4.6 सेकंदांसाठी स्वतःची नजर रस्त्यावरून हटवते. याचा अर्थ जर आपल्या गाडीचा स्पीड 8 किलोमीटर प्रतितास असेल, तर आपण एका फुटबॉल मैदानामधील अंतर कापतो. गेल्या काही दिवसांपूर्वीही एका तीन वर्षांचा मुलाचा असाच अपघातात जीव गेला. तो रस्त्यानं चालत असताना गाडीचालक मेसेज टाइप करण्यात व्यस्त होता आणि त्यानं मुलाला उडवलं. त्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला.

भारत सरकारनं रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एक यादीही जाहीर केली आहे. रिपोर्टनुसार, 2016मध्ये मोबाइल वापरत असताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2138 होती. तर अपघातात जखमी झालेल्यांची संख्या 4746 आहे. तर वर्षं 2017मध्ये मृतांचा आकडा वाढून 3172पर्यंत गेला होता. तर 7830 लोक जखमी होते. हा आकडा दरवर्षी वाढतच जातोय.  

टॅग्स :carकार