शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

विविध कंपन्यांच्या गाड्या महागणार असल्याने ग्राहकांना बसणार झटका; वर्षभरातील तिसरी भाववाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 08:59 IST

वाढलेल्या उत्पादन खर्चाचा परिणाम : वर्षभरातील तिसरी भाववाढ

नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या काळात वाहनांचे सुटेभाग महाग झाल्यामुळे सर्व कार उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. आता पुन्हा ग्राहकांना भाववाढीचा झटका बसणार आहे. मारुती सुझुकी व टाटा माेटर्सच्या वाहनांच्या किमती सप्टेंबरपासून वाढणार आहेत.

मारुती सुझुकीने या वर्षी तिसऱ्यांदा वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. कंपनीने सांगितले, की गेल्या वर्षभरात सातत्याने उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. सप्टेंबरपासून कंपनीचे सर्वच माॅडेल्स महागणार आहेत. नेमकी किती वाढ हाेणार आहे, याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. सध्याच्या गाड्यांमध्ये लागणाऱ्या चिपची किंमत यावर्षी वाढली आहे. त्यामुळेही यापूर्वी भाववाढ करावी लागली हाेती. कोरोना महामारीच्या काळात वाहनांच्या सुट्या भागांचे भाव वाढल्याने ही दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

टाटा माेटर्सचाही भाववाढीचा निर्णय

मारुती सुझुकीप्रमाणे टाटा माेटर्सनेही काही प्रवासी गाड्यांच्या किमती वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरसकट ०.८ टक्के वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ माॅडेल आणि व्हेरियंटवर अवलंबून राहणार आहे. कंपनीने या निर्णयामागील कारण स्पष्ट केलेले नाही. भाववाढीचे प्रमाण जाहीर केले असले तरी काेणत्या वाहनांच्या किमतीवर किती परिणाम हाेईल, याबाबत माहिती दिलेली नाही. 

ग्राहकांसह सर्वांनाच बसणार फटका

यापूर्वी मारुती सुझुकीने जुलैमध्ये स्विफ्ट व इतर माॅडेल्सच्या सीएनजी व्हेरियंटच्या किमतीत वाढ करण्यात आली हाेती. त्यापूर्वी एप्रिलमध्येही काही माॅडेल्सच्या किमती वाढविल्या हाेत्या. तसेच ह्युंदाई, टाटा माेटार्स, महिंद्र आणि महिंद्र, टाेयाेटा, हाेंडा अशा जवळपास सर्वच कंपन्यांनी २०२१ मध्ये गाड्यांच्या किमती वाढविल्या आहेत.  ह्युंदाईच्या गाड्यांच्याही किमतीमध्ये ५ ते ३४ हजार रुपयापर्यंत वाढ झालेली आहे. महिंद्र आणि महिंद्रचीही प्रवासी वाहने जुलैपासून ५ ते २८ हजार रुपयापर्यंत महाग झालेली आहेत. त्यामुळे नवीन वाहन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योग