शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जलमय रस्त्यांवरच्या वाहनांची स्थितीही झाली पूरग्रस्तांसारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:00 IST

मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली.

ठळक मुद्देजलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते.जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतील

मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली. रस्त्यावर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलेले होते, काही ठिकाणी त्याहूनही जास्त पाणी होते. अनेक मोटारसायकल व स्कूटरचालक त्याही परिस्थितीत आपल्या वाहनांना पाण्यातून नेत होते.कमी ग्राऊंड क्लीअरन्स असणाऱ्या कार्सही या पाण्यामधून मार्गक्रमण करीत होत्या.वास्तविक रस्त्याचा अंदाज नसतानाही आपली वाहने अशा खोल पाण्यात घालण्याचे धाडस केले गेले, त्यात काही पारही झाले काही वाहने फसली. खरे म्हणजे अशा प्रकारच्या परिस्थितीत अतिशय गांभीर्याने विचार करून वाहन चालकांनी जलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते. किमान मोटारसायकल व स्कूटर्ससारख्या वाहनांनी वाहने अशा रस्त्यांमध्ये चालवायला नकोत.

ज्यांची वाहने जलमय रसत्यांवर उभी होती, त्यांची अपरिहार्यता एकवेळ समजू शकते. मात्र आता जलमय रस्त्यांमध्ये वाहने घातल्यानंतर ड्राईव्ह करताना करावी लागणारी कसरत, अनपेक्षित धोके आदी बाबींचा विचार करणे खरे म्हणजे प्रत्येक वाहन चालकाने ती मॅच्युरिटी दाखवायला हवी. असेच नव्हेत तर अन्य अशाच प्रकारच्या आपत्तींमध्ये आपली सुरक्षा व वाहनाचीही सुरक्षा ही महत्त्वाची असते, हे समजून घेणे गरजेचे असते. आता या जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतीलच पण ज्यांनी जलमय रस्त्यातूनही रस्ता पार केला असेल, त्यांनाही आपली गाडी नीट तपासून, घ्यावी लागणार आहे. मोटारसायकलींची तर तीन फूट पाण्यात जाण्याने झालेली स्थिती नीट लक्षात घेऊन सारी यंत्रणा तपासून व साफसूफ करून घ्यावी लागणार यात शंका नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की आता या जलमय स्थितीमुळे झालेले नुकसान व संभाव्य नुकसान प्रत्येक वाहन चालक, मालकाने नीट समजून त्यावर नीट उपचार करायला हवेत.

स्थिती पूर्ववत झाल्यानंतर पहिली कामगिरी आता तीच करावी लागणार आहे. सर्व्हिसिंग, पूर्णपणे तपासणी, तेलपाणी सारे काही पाहावे लागणार आहे. एकंदर काय वाहनांची अवस्था तूर्तास तरी पूरग्रस्तांसारखी असणार आहे. त्यांना सावरण्यासाठी कामे करावी लागणार हे नक्की. शहरांमधील अनेकांची वाहने ही दैनंदिन वापरासाठी असणारी अत्यावश्यक साधनेच बनलेली आहेत. पण ती नीट व ठाकठीक असल्याची खात्री केल्याविना वापरू नयेत इतकेच.

 

टॅग्स :AutomobileवाहनMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार