शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जलमय रस्त्यांवरच्या वाहनांची स्थितीही झाली पूरग्रस्तांसारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:00 IST

मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली.

ठळक मुद्देजलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते.जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतील

मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली. रस्त्यावर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलेले होते, काही ठिकाणी त्याहूनही जास्त पाणी होते. अनेक मोटारसायकल व स्कूटरचालक त्याही परिस्थितीत आपल्या वाहनांना पाण्यातून नेत होते.कमी ग्राऊंड क्लीअरन्स असणाऱ्या कार्सही या पाण्यामधून मार्गक्रमण करीत होत्या.वास्तविक रस्त्याचा अंदाज नसतानाही आपली वाहने अशा खोल पाण्यात घालण्याचे धाडस केले गेले, त्यात काही पारही झाले काही वाहने फसली. खरे म्हणजे अशा प्रकारच्या परिस्थितीत अतिशय गांभीर्याने विचार करून वाहन चालकांनी जलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते. किमान मोटारसायकल व स्कूटर्ससारख्या वाहनांनी वाहने अशा रस्त्यांमध्ये चालवायला नकोत.

ज्यांची वाहने जलमय रसत्यांवर उभी होती, त्यांची अपरिहार्यता एकवेळ समजू शकते. मात्र आता जलमय रस्त्यांमध्ये वाहने घातल्यानंतर ड्राईव्ह करताना करावी लागणारी कसरत, अनपेक्षित धोके आदी बाबींचा विचार करणे खरे म्हणजे प्रत्येक वाहन चालकाने ती मॅच्युरिटी दाखवायला हवी. असेच नव्हेत तर अन्य अशाच प्रकारच्या आपत्तींमध्ये आपली सुरक्षा व वाहनाचीही सुरक्षा ही महत्त्वाची असते, हे समजून घेणे गरजेचे असते. आता या जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतीलच पण ज्यांनी जलमय रस्त्यातूनही रस्ता पार केला असेल, त्यांनाही आपली गाडी नीट तपासून, घ्यावी लागणार आहे. मोटारसायकलींची तर तीन फूट पाण्यात जाण्याने झालेली स्थिती नीट लक्षात घेऊन सारी यंत्रणा तपासून व साफसूफ करून घ्यावी लागणार यात शंका नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की आता या जलमय स्थितीमुळे झालेले नुकसान व संभाव्य नुकसान प्रत्येक वाहन चालक, मालकाने नीट समजून त्यावर नीट उपचार करायला हवेत.

स्थिती पूर्ववत झाल्यानंतर पहिली कामगिरी आता तीच करावी लागणार आहे. सर्व्हिसिंग, पूर्णपणे तपासणी, तेलपाणी सारे काही पाहावे लागणार आहे. एकंदर काय वाहनांची अवस्था तूर्तास तरी पूरग्रस्तांसारखी असणार आहे. त्यांना सावरण्यासाठी कामे करावी लागणार हे नक्की. शहरांमधील अनेकांची वाहने ही दैनंदिन वापरासाठी असणारी अत्यावश्यक साधनेच बनलेली आहेत. पण ती नीट व ठाकठीक असल्याची खात्री केल्याविना वापरू नयेत इतकेच.

 

टॅग्स :AutomobileवाहनMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार