शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जलमय रस्त्यांवरच्या वाहनांची स्थितीही झाली पूरग्रस्तांसारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:00 IST

मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली.

ठळक मुद्देजलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते.जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतील

मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली. रस्त्यावर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलेले होते, काही ठिकाणी त्याहूनही जास्त पाणी होते. अनेक मोटारसायकल व स्कूटरचालक त्याही परिस्थितीत आपल्या वाहनांना पाण्यातून नेत होते.कमी ग्राऊंड क्लीअरन्स असणाऱ्या कार्सही या पाण्यामधून मार्गक्रमण करीत होत्या.वास्तविक रस्त्याचा अंदाज नसतानाही आपली वाहने अशा खोल पाण्यात घालण्याचे धाडस केले गेले, त्यात काही पारही झाले काही वाहने फसली. खरे म्हणजे अशा प्रकारच्या परिस्थितीत अतिशय गांभीर्याने विचार करून वाहन चालकांनी जलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते. किमान मोटारसायकल व स्कूटर्ससारख्या वाहनांनी वाहने अशा रस्त्यांमध्ये चालवायला नकोत.

ज्यांची वाहने जलमय रसत्यांवर उभी होती, त्यांची अपरिहार्यता एकवेळ समजू शकते. मात्र आता जलमय रस्त्यांमध्ये वाहने घातल्यानंतर ड्राईव्ह करताना करावी लागणारी कसरत, अनपेक्षित धोके आदी बाबींचा विचार करणे खरे म्हणजे प्रत्येक वाहन चालकाने ती मॅच्युरिटी दाखवायला हवी. असेच नव्हेत तर अन्य अशाच प्रकारच्या आपत्तींमध्ये आपली सुरक्षा व वाहनाचीही सुरक्षा ही महत्त्वाची असते, हे समजून घेणे गरजेचे असते. आता या जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतीलच पण ज्यांनी जलमय रस्त्यातूनही रस्ता पार केला असेल, त्यांनाही आपली गाडी नीट तपासून, घ्यावी लागणार आहे. मोटारसायकलींची तर तीन फूट पाण्यात जाण्याने झालेली स्थिती नीट लक्षात घेऊन सारी यंत्रणा तपासून व साफसूफ करून घ्यावी लागणार यात शंका नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की आता या जलमय स्थितीमुळे झालेले नुकसान व संभाव्य नुकसान प्रत्येक वाहन चालक, मालकाने नीट समजून त्यावर नीट उपचार करायला हवेत.

स्थिती पूर्ववत झाल्यानंतर पहिली कामगिरी आता तीच करावी लागणार आहे. सर्व्हिसिंग, पूर्णपणे तपासणी, तेलपाणी सारे काही पाहावे लागणार आहे. एकंदर काय वाहनांची अवस्था तूर्तास तरी पूरग्रस्तांसारखी असणार आहे. त्यांना सावरण्यासाठी कामे करावी लागणार हे नक्की. शहरांमधील अनेकांची वाहने ही दैनंदिन वापरासाठी असणारी अत्यावश्यक साधनेच बनलेली आहेत. पण ती नीट व ठाकठीक असल्याची खात्री केल्याविना वापरू नयेत इतकेच.

 

टॅग्स :AutomobileवाहनMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार