शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

फेब्रुवारीत कारच्या विक्रीत जबरदस्त वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 04:52 IST

कोरोनानंतर काही कंपन्यांची उच्चांकी कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुरवठा साखळीमध्ये अजूनही समस्या असल्या तरी फेब्रुवारीमध्ये देशातील कार विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टोयोटा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांना कारविक्रीचा मोठा लाभ झाला आहे. निस्सानसारख्या कंपनीची विक्री तर ऐतिहासिक उच्चांकावर गेली आहे.

सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे वाहन उत्पादनासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली होती. ती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. विशेषत: सेमिकंडक्टरचा पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. असे असतानाही कार विक्रीमध्ये फेब्रुवारीत जबरदस्त वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मारुतीच्या प्रवासी वाहनांची विक्री ८ टक्क्यांनी वाढून १.४ लाख गाड्यांवर गेली. २९ टक्के वाढीसह ह्युंदाईची ५१,६०० प्रवासी वाहने विकली गेली. टाटा मोटार्सच्या विक्रीत तब्बल ११९ टक्के वाढ झाली. कंपनीची २७,२२५ वाहने विकली गेली. महिंद्राने ४१ टक्के वाढीसह १५,३९१ वाहने विकली. निस्सानचे एम.डी. राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, आमच्या ‘मॅग्नाइट’ला जबरदस्त बुकिंग मिळत आहे. त्यामुळे आम्ही उत्पादन वाढवीत आहोत. 

दुचाकींमध्ये हीरोची विक्री वाढलीदेशातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत १.४५ टक्का वाढ झाली आहे. कंपनीने फेब्रुवारीत ५,०५,४६७ गाड्या विकल्या. मागच्या वर्षी हा आकडा ४,७९,३१० होता. सुझुकी मोटारसायकल इंडियाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२१ मध्ये कंपनीच्या ५९,५३० गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षी हा आकडा ५८,६४४ होता.

टॅग्स :carकारAutomobileवाहन