शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भारत एनकॅपला अखेर मुहूर्त सापडला; या चार कंपन्या पाठविणार कार, मारूती आहे का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:58 IST

भारत एनकॅपमध्ये भारत, जपान आणि दक्षिण कोरियाच्या कंपन्यांच्या कारची सुरुवातीला टेस्टिंग केली जाणार आहे.

ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळविल्यानंतर आता भारतीय कंपन्या भारत एनकॅपसाठी सज्ज झाल्या आहेत. त्या चाचणीपेक्षा ही चाचणी थोडी कमीच असली तरी देखील सध्याच्या लोकांच्या कलानुसार कंपन्या सुरक्षित कार देण्याकडे वळल्या आहेत. टाटाने देशाला पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग असलेली कार दिली होती. यामुळे BNCAP मध्ये देखील टाटाचा डंका असणार आहे. 

भारत एनकॅप १५ डिसेंबरपासून सुरु होत आहे. भारतात बनलेल्या कारची या ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. सुरुवातीला चार कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत. य़ामध्ये तीन फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार बनविलेल्या कंपन्या आणि एक शून्य स्टार रेटिंगच्या कार बनविणारी कंपनी असणार आहे. 

वयस्कर आणि लहान मुलांच्या सुरक्षेवरून या कारना सुरक्षा रेटिंग दिले जाणार आहे. ग्लोबल एनकॅपमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा आणि स्कोडा, फोक्सवॅगन आणि ह्युंदाईच्या एका कारला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले आहे. 

भारत एनकॅपमध्ये भारत, जपान आणि दक्षिण कोरियाच्या कंपन्यांच्या कारची सुरुवातीला टेस्टिंग केली जाणार आहे. यामध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि महिंद्रा असणार आहे. या चारही कंपन्या सध्या भारतीय बाजारात टॉपवर आहेत. यापैकी टाटाकडे सर्वाधिक सुरक्षित कार आहेत. तर मारुतीकडे एकही कार सुरक्षित म्हणजेच फाईव्ह स्टार रेटिंगची नाहीय. उलट मारुतीकडे झिरो आणि एक स्टार रेटिंगच्याच कार भरपूर आहेत. 

भारतात एनकॅप टेस्टिंग बंधनकारक नाहीय. परंतू, विक्री आणि ग्राहकांच्या विश्वासासाठी कंपन्यांना हे गरजेचे वाटू लागले आहे. दुसरीकडे ग्राहकही जागरुक झाला आहे. १०-१५ लाख रुपये गुंतवायचे आणि आपल्यासोबत कुटुंबाचाही जीव धोक्यात का घालायचा असा विचार आता भारतीय ग्राहक, तरुणाई करू लागली आहे. 

टॅग्स :MarutiमारुतीTataटाटाMahindraमहिंद्राHyundaiह्युंदाई