शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ऑटो क्षेत्रात एक वर्षांपासून मंदी; जीएसटी कमी करा, इंडस्ट्रीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 17:40 IST

प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग दहाव्या महिन्यात घट झाली आहे.

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ आता अधिकच गडद होताना दिसत आहे. याचाच सर्वाधिक जास्त फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. ऑटो क्षेत्रात तब्बल 19 वर्षांनंतर मंदीची लाट आली असून प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 31.75 टक्कांची घट होऊन 1 लाख 96 हजार 524 युनिट इतकी राहिली. तर गेल्या वर्षी हा आकडा 2 लाख 87 हजार 198 युनिक होता.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग दहाव्या महिन्यात घट झाली आहे. कारच्या विक्रीत 41.09 टक्कांची घट होऊन 1 लाख 15 हजार 957 युनिट इतकी झाली आहे. ऑटो क्षेत्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी घट असल्याचे बोलले जात आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (SIAM) 1997-98 मध्ये ऑटो विक्रीचे आकडे देण्यास सुरुवात केली होती.

दुचाकी वाहनांच्या विक्रीत 22.24 टक्कांची घटमोटारसायकल विक्रीत गेल्या महिन्यात 22.24 टक्कांची घट झाली आहे. ही घट 9 लाख 37 हजार 486 युनिट इतकी आहे. ऑगस्ट 2018 मध्ये 12 लाख 7 हजार 5 मोटारसायकलींची विक्री झाली होती. तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत 22.24 टक्कांची घट होऊन 15 लाख 14 हजार 196 युनिट इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 19 लाख 47 हजार 304 युनिट दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. 

एक वर्षांपासून मंदी; जीएसटीत घट करण्याची इंडस्ट्रीची मागणीऑटो क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या वाहन विक्रीत एक वर्षांपासून घट होत आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग दहाव्या महिन्यता घट होत असल्यामुळे कंपन्याचे उत्पादन कमी झाले आहे. याचा परिणाम रोजगारावर होत आहे. आगामी वर्षात लागू होणाऱ्या बीएस-VI मानांकनामुळे लोकांच्या मनात शंका होती. दरम्यान, वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या काही दिवसांत स्पष्ट केले होते की, 1 मार्च 2020 पर्यंत खरेदी केलेल्या बीएस-VI वाहन रजिस्ट्रेशन पूर्ण कालावधीपर्यंत वैध राहील. 

याचबरोबर, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून पेट्रोल-डिझेल वाहनांवर केंद्र सरकार बंदी घालण्यासाठी नवीन योजना आखत असल्याची चर्चा  गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती. मात्र, यावर रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा करत पेट्रोल-डिझेल वाहनांवर केंद्र सरकार कोणत्याही प्रकारची बंदी आणणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ऑटो इंडस्ट्रीने केंद्र सरकारकडे जीएसटी 28 टक्कांवरून 18 टक्के करण्याची मागणी केली आहे. 

(कारचं कौतुक संपलं, गियर बदला; आशियातील मोठ्या बँकरचा ऑटो कंपन्यांना इशारा)

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगGSTजीएसटी