शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आधीच मंदी, त्यात कर्मचाऱ्यांनी केली कामबंदी; Ashok Leyland अडकली कात्रीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:16 IST

अशोक लेलँड ट्रक, टेम्पो, बससारखी अवजड वाहने बनविते.

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सध्या मंदीचे जोरदार वारे सुरू आहेत. गेल्या 20 वर्षांतील मोठी मंदी असल्याचे बोलले जात आहे. मारुती सुझुकीनेही खर्चात कपात करण्यासाठी तीन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. टाटा मोटर्सनेही उत्पादनात कपात करण्यासाठी काही दिवस कंपनी बंद ठेवली होती. आता यानंतर आणखी एका भारतीय कंपनीचा नंबर लागला आहे. 

अशोक लेलँड ट्रक, टेम्पो, बससारखी अवजड वाहने बनविते. मात्र, मंदीचा फटका या क्षेत्रालाही बसला आहे. यामुळे कंपनीने कार्यकारी स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. कंपनीने ही योजना अशावेळी आणली आहे, जेव्हा मंदी आणि त्यांचे कर्मचारी बोनस वाढविण्यासाठी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन करत आहेत. 

अशोक लेलँडच्या कर्मचारी संघटनेच्या सुत्रांनी सांगितले की, आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे. मॅनेजमेंटने सोमवारपर्यंत कारखान्यात काम बंद केले आहे. कंपनीचे संचालक मंडळ आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. 

कंपनीच्या कामगार संघटनेने बोनसमध्ये 10 टक्क्यांची वाढ मागितली आहे. तर कंपनी 5 टक्के वाढ देण्यास तयार आहे. दरम्यान, हिंदूजा समुहाच्या या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक नोटीस जाहीर करत स्वेच्छा निवृत्तीची योजना किंवा ईएसएसची योजना दिली आहे. सुत्रांनुसार जे कर्मचारी व्हीआरएससाठी बसत नसतील तर त्यांच्यासाठी ही ईएसएस योजना आहे. 

ऑटो इंडस्ट्री मंदी आणि बीएस 6 च्या कचाट्यात सापडली आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतेच या कंपन्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू ठेवल्याचे दिसत आहे. ऑटो सेक्टरने 2000 मध्ये यापेक्षा मोठ्या मंदीचा सामना केला होता. 

मारुतीचे अध्यक्ष भार्गव यांना मारुती सुझुकीने केलेल्या कामगार कपातीवर प्रश्न करण्यात आला होता. यावेळी त्यांनी होकार देत तीन हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्याचे सांगितले. ऑटोमोबाईल सेक्टर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण करतो. विक्री, सेवा, इन्शुरन्स, लायसन्स, फायनान्स, अॅक्सेसरीज, ड्रायव्हर, पेट्रोल पंप आणि ट्रान्सपोर्टेशन यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या प्रभावित असणार आहेत. कल्पने पलिकडे या क्षेत्राला मोठा फटका बसणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 

टॅग्स :MarutiमारुतीTataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीNarendra Modiनरेंद्र मोदी