शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कारमधून प्रवास करताना भारतातील १० पैकी ७ जण करतात ही चूक, जाणून घ्या सीटबेल्टचं एअर बॅगशी काय आहे कनेक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:30 IST

Car Driving: भारतामध्ये १० पैकी ७ प्रवासी हे वाहनाच्या मागच्या सीटवरून प्रवास करताना कधीही सीटबेल्ट बांधत नाहीत. एका सर्व्हेमधून याबाबतची माहिती समोर आली आहे.

मुंबई - भारतामध्ये १० पैकी ७ प्रवासी हे वाहनाच्या मागच्या सीटवरून प्रवास करताना कधीही सीटबेल्ट बांधत नाहीत. एका सर्व्हेमधून याबाबतची माहिती समोर आली आहे. सर्व्हेमध्ये १० हजारांहून अधिक लोकांना सिटबेल्ट वापरण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले, यामधील २६ टक्के लोकांनी सांगितलं की, ते मागच्या सीटवर बसून प्रवास करत असताना कधीही सिट बेल्ट वापरत नाहीत.

रविवारी टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या अपघाताचा तपास करत असताना त्यांनी सिट बेल्ट लावली नसल्याचे निष्पन्न झाले होते. सायरस मिस्त्री कारच्या मागच्या सिटवर बसून प्रवास करत होते. त्यांच्यासोबत प्रवास करत असलेल्या पुढे बसलेल्या ड्रायव्हरसह दोघांनीही सिट बेल्ट बांधली होती. या अपघातामध्ये त्यांचे प्राण बालंबाल बचावले. मात्र मागच्या सिटवर बसलेले सायरस मिस्री आणि जहांगिर पंडोल यांचा मृत्यू झाला. या दोघांनीही सीट बेल्ट बांधली नव्हती.

सीट बेल्ट हे कारसेप्टीच्या बेसिक फीचर्सपैकी एक आहेत. अनेक देशांमध्ये ड्रायव्हर आणि सर्व प्रवाशांसाठी सिट बेल्ट वापरणं आवश्यक आहे. त्यासाठी कायदे बनवण्यात आले आहेत. एअरबॅगची डिझाइन पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी करण्यात आली आहे.

सीटबेल्ट आणि एअरबॅग एकत्र काम करतात. भारतामध्ये बहुतांश कार ट्विन एअरबॅग आणि सर्व सीटवर सीटबेल्टसह येतात. सीटबेल्ट आणि एअरबॅग अपघातादरम्यान प्राण वाचवण्यासाठी मिळून काम करतात. सीटबेल्ट लावल्या नाहीत तरी एअरबॅग काम करतात. मात्र कारमध्ये जिथे एअरबॅग लावलेल्या असतात तिथे एसआरएस लिहिलेले असते. त्याचा अर्थ Supplementary Restraining System असा होतो. म्हणजेच हे कारमधील प्राण वाचवणारे एकमेव साधन नाही आहे.

एअर बॅग अनेक सेंसरने कंट्रोल होते. यामध्ये इम्पॅक्ट सेंसर, प्रेशर सेंसर, ब्रेक प्रेशर सेंसर यांचा समावेश होते. सीट बेल्ट आणि एअरबॅगमध्ये कुठलेही इलेक्ट्रॉनिक कनेक्शन नाही आहे. मात्र अपघातादरम्यान, एअरबॅग तुमची छाती, चेहरा आणि डोक्याची सुरक्षा करते. तर सीट बेल्ट तुम्हाला जोराचा धक्का बसला तरी तुमचे शरीर स्थिर ठेवण्यास मदत करते.  

टॅग्स :carकारroad safetyरस्ते सुरक्षा