शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंदीचा विळखा : 30 स्टील कंपन्यांना लागले टाळे; टाटा मोटर्सने उत्पादन थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:02 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर गेल्या काही महिन्यांत विक्रीमध्ये कमालीची घसरण नोंदविली आहे. यामुळे अनेक शोरूम बंद पडू लागले असून या क्षेत्रावर अवलंबून असलेले जवळपास 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 

वाहन क्षेत्राने या वर्षीच्या सुरुवातीपासूनच विक्रीमध्ये घसरण नोंदविली आहे. भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपनीने काही दिवसांसाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. वाहन कंपन्यांनी उत्पादन थांबविल्याने याचा थेट फटका स्टील इंडस्ट्रीला बसला आहे. जमशेदपूरमधील 30 स्टील कंपन्यांनी काही दिवसांसाठी उत्पादन थांबवत टाळे ठोकले आहे. तर तेथील टाटा मोटर्सच्या प्रकल्पाने उत्पादन थांबविले आहे. 

गुरुवारी जमशेदपूरमधील आदित्यपूर इंडस्ट्रियल एरियातील 12 स्टील कंपन्यांनी काम बंद करत टाळे ठोकले. तर अन्य 30 कंपन्यांनाही येत्या काही काळात टाळे ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. या सर्व कंपन्या टाटा मोटर्सला गाड्यांसाठी सुटे भाग पुरवितात. मागणी घटल्याने टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात सलग चौथ्यांदा काम थांबविले आहे. गुरुवार ते शनिवार कंपनीने काम थांबविले आहे. रविवारी कंपनीला सुटी असते. 

तसेच कंपनीने 1 हजार कर्मचाऱ्यांना 12 ऑगस्टलाच कामावर येण्याची सूचना केली आहे. तर नियमित कर्मचारी 5 ऑगस्टपासून कामावर येणार आहेत. गेल्या दोन महिन्यात कंपनीमध्ये केवळ 15 दिवस काम झाले आहे. 

30 हजार लोकांच्या रोजगारावर संकटजमशेदपुर, आदित्यपुरमध्ये जवळपास व्हेंडर कंपन्यांच्या 30 हजार लोकांच्या रोजगारावर संकट उभे ठाकले आहे. त्यातच राज्य सरकारने विजेचे दरही वाढविल्याने त्याचा फटकाही कंपन्यांना बसला आहे. 

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगMaruti Suzukiमारुती सुझुकी