शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मंदीचा विळखा : 30 स्टील कंपन्यांना लागले टाळे; टाटा मोटर्सने उत्पादन थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:02 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर गेल्या काही महिन्यांत विक्रीमध्ये कमालीची घसरण नोंदविली आहे. यामुळे अनेक शोरूम बंद पडू लागले असून या क्षेत्रावर अवलंबून असलेले जवळपास 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 

वाहन क्षेत्राने या वर्षीच्या सुरुवातीपासूनच विक्रीमध्ये घसरण नोंदविली आहे. भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपनीने काही दिवसांसाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. वाहन कंपन्यांनी उत्पादन थांबविल्याने याचा थेट फटका स्टील इंडस्ट्रीला बसला आहे. जमशेदपूरमधील 30 स्टील कंपन्यांनी काही दिवसांसाठी उत्पादन थांबवत टाळे ठोकले आहे. तर तेथील टाटा मोटर्सच्या प्रकल्पाने उत्पादन थांबविले आहे. 

गुरुवारी जमशेदपूरमधील आदित्यपूर इंडस्ट्रियल एरियातील 12 स्टील कंपन्यांनी काम बंद करत टाळे ठोकले. तर अन्य 30 कंपन्यांनाही येत्या काही काळात टाळे ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. या सर्व कंपन्या टाटा मोटर्सला गाड्यांसाठी सुटे भाग पुरवितात. मागणी घटल्याने टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात सलग चौथ्यांदा काम थांबविले आहे. गुरुवार ते शनिवार कंपनीने काम थांबविले आहे. रविवारी कंपनीला सुटी असते. 

तसेच कंपनीने 1 हजार कर्मचाऱ्यांना 12 ऑगस्टलाच कामावर येण्याची सूचना केली आहे. तर नियमित कर्मचारी 5 ऑगस्टपासून कामावर येणार आहेत. गेल्या दोन महिन्यात कंपनीमध्ये केवळ 15 दिवस काम झाले आहे. 

30 हजार लोकांच्या रोजगारावर संकटजमशेदपुर, आदित्यपुरमध्ये जवळपास व्हेंडर कंपन्यांच्या 30 हजार लोकांच्या रोजगारावर संकट उभे ठाकले आहे. त्यातच राज्य सरकारने विजेचे दरही वाढविल्याने त्याचा फटकाही कंपन्यांना बसला आहे. 

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगMaruti Suzukiमारुती सुझुकी