शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात 'या' तंत्रज्ञानावर चालणार वाहनं, मोठा बदल होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 15:08 IST

वाचा काय होणार बदल आणि काय म्हणाले नितीन गडकरी.

2030 पर्यंत, देशात विक्री केल्या जाणार्‍या नवीन वाहनांपैकी 30 टक्के इलेक्ट्रीक प्रवासी वाहने असतील. क्लेमेंट अँड एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधनात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर कौन्सिल (CEEW) च्या अहवालात असे म्हटले आहे की 2050 पर्यंत, विक्री होणाऱ्या एकूण वाहनांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा वाटा 75 टक्क्यांपर्यंत वाढेल. 2030 पर्यंत एकूण नवीन दुचाकींपैकी निम्म्या दुचाकी इलेक्ट्रीक दुचाकी असतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. तसेच तीनचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रीकचा वाटा 25 टक्के असेल.

१३ लाख इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणीयाशिवाय, सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात 13 लाखांहून अधिक इलेक्ट्रीक वाहनांची (ई-वाहने) नोंदणी झाली आहे. तर 2826 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) कार्यरत आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

14 जुलै 2022 पर्यंत देशातील एकूण इलेक्ट्रीक वाहनांची संख्या 13,34,385 आहे आणि यामध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपच्या आकडेवारीचा समावेश नाही, असे त्यांनी सांगितले. यासोबतच ते म्हणाले की, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) नुसार देशात एकूण 2826 पीसीएस कार्यरत आहेत.

अवजड उद्योग मंत्रालयाच्या फेज-II (FAME इंडिया फेज-II) मध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा जलद अवलंब आणि उत्पादन करण्याच्या योजनेंतर्गत, 68 शहरांमध्ये 2877 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आणि 9 द्रुतगती मार्ग आणि 16 महामार्गांवर 1576 चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरNitin Gadkariनितीन गडकरीRajya Sabhaराज्यसभा