शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' रात्री नारेगाव वासियांनी अनुभवला भयावह थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 11:29 IST

पळशी, पिसादेवी भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने आलेला पूर नारेगावातील अजीज कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनीत घुसल्याने सर्वत्र हाहाकार उडाला.

ठळक मुद्देसुखना नदीच्या पात्रात अनेक अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पुरानेही गावावर अतिक्रमण केल्याची परिस्थिती निर्माण केली.

औरंगाबाद : जयभवानीनगर, सिडको एन-६ भागात पावसाच्या प्रवाहाने दोन बळी घेतल्यानंतरही महापालिका  कुंभकर्णी झोपेतच आहे. पळशी, पिसादेवी भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने आलेला पूर नारेगावातील अजीज कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनीत घुसल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. सुखना नदीच्या पात्रात अनेक अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पुरानेही गावावर अतिक्रमण केल्याची परिस्थिती निर्माण केली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पुढाकार घेत मध्यरात्रीच नाला दोन ठिकाणी फोडल्याने पाण्याचा जोर पहाटे ओसरला.

२१ जूनच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अजीज कॉलनी आणि आसपासच्या विविध वसाहतींत धोक्याची घंटा वाजली होती. पहिल्याच मोठ्या पावसामुळे या भागात पाणीच पाणी झाले होते. महापालिकेने या घटनेचे गांभीर्य ओळखले नाही. नगरसेवक गोकुळ मलके यांनी प्रशानाला वारंवार सांगून, पत्रव्यहार करूनही काहीच उपयोग झाला नाही. शनिवारी रात्री नारेगाव भागात रिमझिम पाऊस येऊन गेला. त्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नागरिकांनी नगरसेवक मलके यांना फोन केला की, अजीज कॉलनीत जास्त पाणी शिरले. मलके घराबाहेर येऊन पाहतात, तर थेंबभरही पाऊस नव्हता. 

नागरिक खोटे तर बोलणार नाहीत, म्हणून ते नारेगाव मनपा शाळेजवळ पोहोचले. या भागातील सिमेंट रोडवरच तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले होते. गावात जिकडेतिकडे पुरसदृश परिस्थिती होती. प्रत्येक घरातून किंकाळ्या, वाचवा वाचवा, इकडून तिकडे धावपळ सुरू होती. हे दृश्य पाहून नगरसेवक हादरले. दीड हजाराहून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी गेले होते. एवढे मोठे पाणी काढायचे कसे, हे कोणालाही उमजत नव्हते.

पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणेनारेगाव पंचक्रोशील सर्वात मोठी नदी म्हणजे सुखना होय. या नदीचे पात्र खूप मोठे आहे. मागील काही वर्षांत नदीपात्रात असंख्य अतिक्रमणे करण्यात आली आहेत. पूर्वी नदीचे पात्र ५० ते ६० फूट रुंद होते. आता नारेगावच्या मुख्य रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नदीपात्र अवघे ७ ते ८ फूट उरले आहे. पात्रातून पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने मोठ-मोठे सिमेंट पाईप टाकले आहेत. या पाईपमध्ये केरकचरा साचल्याने थेंबभर पाणीही पुढे जाऊ शकत नाही. शनिवारी रात्री पिसादेवी, पळशी भागात झालेल्या मोठ्या पावसानंतर पाण्याचा प्रवाह नारेगावात घुसला.

पहाटे पाणी ओसरलेसिडको वॉर्ड कार्यालयाने मध्यरात्री एक जेसीबी उपलब्ध करून दिला. त्यामुळे नारेगावात दोन ठिकाणी नाला फोडण्यात आला. त्यामुळे पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाणी ओसरले. तब्बल पाच ते सहा तास पाण्याने नारेगावात हाहाकार उडविला होता. या भागातील छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी होते; परंतु सुदैवाने कोणी वाहून गेले नाही. पळशीहून आलेल्या पुरात आणखी थोडीशीही वाढ झाली असती, तर नारेगावात अनेक नागरिकांच्या जिवावर बेतले असते.

भूमाफियांनी नालेही सोडले नाहीतजुन्या शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांनी आपले घर विकून नारेगाव पंचक्रोशीत आश्रय घेतला आहे. या भागातील ९९ टक्केYप्लॉटिंग अनधिकृत असून, अतिक्रमणेही झाली आहेत. भूमाफियांनी नाल्यांमध्येही प्लॉटिंग करून विक्री केली आहे. नारेगाव येथील मुख्य नदीत किमान २० घरे पाण्याचा प्रवाह अडवत आहेत. ही अतिक्रमणे न काढल्यास भविष्य काळात आणखी मोठा अनर्थ होऊ शकतो. 

आणीबाणी पथक कागदावरचपावसाळ्यात शहरात कुठेही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास झोननिहाय आणीबाणी पथक घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना मदत करील, असा आदेश ४८ तासांपूर्वीच दस्तूरखुद्द मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी काढला होता. या आदेशाची शनिवारी अंमलबजावणीच झाली नसल्याची धक्कादायक बाब नारेगाव येथील घटनेमुळे उघडकीस आली. वॉर्ड कार्यालयात असे कोणतेच पथक नसल्याचे लक्षात आल्यावर वॉर्ड अभियंत्याला विनंती करून जेसीबी मागविण्यात आला. तोपर्यंत अग्निशमन विभागाचा ताफाही दाखल झाला होता.

संसाराची राखरांगोळीशनिवारी रात्री अजीज कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनी आदी भागांत शिरलेल्या पाण्याने गोरगरिबांच्या संसारांची राखरांगोळी झाली. पत्र्याची घरे, कच्ची घरे जमीनदोस्त झाली. संसारोपयोगी अनेक वस्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. रविवारी सकाळी अनेक नागरिक आपली घरे सावरताना दिसून आले. 

महापौर, आयुक्त आज पाहणी करणाररविवारी शहर अभियंता एस.डी. पानझडे, वॉर्ड अधिकारी खरपे, माजी सभापती राजू शिंदे यांनी पाहणी केली. सोमवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक नारेगाव भागात पाहणी करणार आहेत. या भागातील नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी कसा सोडविता येईल, यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊसfloodपूर