शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे ढासळतोय जिल्हा परिषदेचा डोलारा

By admin | Updated: January 23, 2015 00:48 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिकाऱ्यांची वानवा दिवसेंदिवस वाढत आहे.

अमरावती : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिकाऱ्यांची वानवा दिवसेंदिवस वाढत आहे. महत्त्वाच्या रिक्त पदांचा भार विशिष्ट अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेचा प्रशासकीय डोलारा ढासळू लागला आहे.जिल्ह्याचा कारभार हाकण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय आखणी केली आहे. त्यात प्रत्येक यंत्रेणेला महत्त्वाचे स्थान आहे. शासन आणि ग्रामपंचायतीत महत्त्वाचा दुवा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. या जिल्हा परिषदेत कृषी, आरोग्य, सामान्य प्रशासन महिला बालकल्याण बांधकाम, सिंचन पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य पंचायत आदी विभाग आहेत. त्यामाध्यमातून योजनांची अंमलबजावणी केली जाते. मागील दोन ते तीन वर्षांपासून शासनाने जिल्हा परिषदेचे महत्त्व कमी केले आहे. योजना राबविणारी एजन्सी म्हणून याकडे पाहिले जाते. शासनाकडून मिळणाऱ्या निधीत ७५ टक्के कपात केली असून ग्रामपंचायतीचा निधी वाढविला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद चालविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्याबळाकडेही दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होत असून अनेक कामे रखडलेली आहेत. जिल्हा परिषदेत वर्ग १ च्या १५ पैकी १० पदे भरलेली असून ५ पदे रिक्त तर वर्ग २ मध्ये ३७८ पैकी ३०० पदे भरली आहेत. ७८ पदे रिक्त आहेत. वर्ग एक आणि वर्ग दोनची सुमारे ३९३ पदे मंजूर आहेत. यापैकी ३१० पदे भरण्यात आली, तर दोन्ही मिळून ८३ पदांचा अनुशेष जिल्हा परिषदेत कायम आहे. यामध्ये अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. याशिवाय उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग, सामान्य प्रशासन विभाग अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कायरकारी अभियंता, पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता, वरिष्ठ व कनिष्ठ भूवैज्ञानिक, लेखा अधिकारी, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट 'अ' मधील १२ पदे रिक्त आहेत. तसेच सहायक गटविकास अखिकारी व एक बीडीओंचे पद रिक्त आहेत. एकंदरीत वर्ग १ ते ४ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे ेप्रशासकीय कामावर विपरीत परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)