शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जिल्हा परिषदेला २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात साधारणतः १५० कोटींचे नियतव्यय मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 10:53 IST

Amravati : प्रशासकीय मान्यतांसाठी धावपळ, मिनी मंत्रालय गर्दीने फुलले

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवरदेखील प्रशासकीय मान्यतांसाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील जवळपास १५० कोटी रुपयांच्या नियोजनाची लगीनघाई सुरू झाली आहे.

विविध कामांच्या 'याद्या'च थेट टेबलावर धडकू लागल्या आहेत. त्यामुळे विधानसभा कधी लागेल ती लागेल, मात्र त्यापूर्वीच गावोगावी मंजूर कामांचे नारळ फोडून राजकीय फटाके फुटणार हे नक्की आहे. जिल्हा परिषदेला २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात साधारणतः १५० कोटींचे नियतव्यय मंजूर आहे. यातून विकासकामांचे नियोजन केले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेत कामे अडकू नयेत, यासाठी प्रशासनाकडूनही तत्परता दाखवली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेत सदस्य नसल्याने आता गट आणि गणातील कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर आहे. जिल्हा परिषदेत पदाधिकारी, सदस्य असताना त्यांनी आपल्या गटातील आणि गणातील निकडीची कामे सुचवली जात होती, त्यानुसार प्रशासनानेही या कामांचा प्राधान्यक्रम तयार केला होता. मात्र, सध्या पदाधिकारी नाहीत. प्रशासक आहेत. त्यामुळे कुठली कामे होणार याची कल्पना नसल्याचा सूर माजी पदाधिकारी व सदस्यांमध्ये आहे. सध्या जिल्हा नियोजनच्या चालू वर्षीच्या बांधकाम विभागला ५० कोटींचे नियतव्यय आले आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य व महिला बालकल्याण विभाग मिळून जवळपास १०० कोटी, त्यामुळे हा आकडा १५० कोटींपर्यत असू शकतो. यातून आचारसंहितेपूर्वी जास्तीत जास्त कामे मंजूर केली जाणार आहेत. यात ३०५४, ५०५४, आदींसह तीर्थक्षेत्र विकास, शाळाखोल्या बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम व अन्य कामांचा समावेश आहे. त्याअनुषंगाने कामे मंजुरीसाठी सर्वच मतदारसंघांतील विद्यमान आमदार आणि त्यांची यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या जिल्हा परिषदेत पदाधिकारी, सदस्य नसल्याने विकासकामांच्या मंजुरीत सामान्य गावांना गरज असूनही कामे होऊ शकत नाही. प्रशासनाने स्वतः ग्राऊंडवर उतरून प्राधान्याने कामे मंजूर करायला हवीत, ज्यामुळे ग्रामीण भागातील निकडीची विकासकामे होऊ शकतात. यानुसार कामे होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती