शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात साधारणतः १५० कोटींचे नियतव्यय मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 10:53 IST

Amravati : प्रशासकीय मान्यतांसाठी धावपळ, मिनी मंत्रालय गर्दीने फुलले

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवरदेखील प्रशासकीय मान्यतांसाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील जवळपास १५० कोटी रुपयांच्या नियोजनाची लगीनघाई सुरू झाली आहे.

विविध कामांच्या 'याद्या'च थेट टेबलावर धडकू लागल्या आहेत. त्यामुळे विधानसभा कधी लागेल ती लागेल, मात्र त्यापूर्वीच गावोगावी मंजूर कामांचे नारळ फोडून राजकीय फटाके फुटणार हे नक्की आहे. जिल्हा परिषदेला २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात साधारणतः १५० कोटींचे नियतव्यय मंजूर आहे. यातून विकासकामांचे नियोजन केले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेत कामे अडकू नयेत, यासाठी प्रशासनाकडूनही तत्परता दाखवली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेत सदस्य नसल्याने आता गट आणि गणातील कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर आहे. जिल्हा परिषदेत पदाधिकारी, सदस्य असताना त्यांनी आपल्या गटातील आणि गणातील निकडीची कामे सुचवली जात होती, त्यानुसार प्रशासनानेही या कामांचा प्राधान्यक्रम तयार केला होता. मात्र, सध्या पदाधिकारी नाहीत. प्रशासक आहेत. त्यामुळे कुठली कामे होणार याची कल्पना नसल्याचा सूर माजी पदाधिकारी व सदस्यांमध्ये आहे. सध्या जिल्हा नियोजनच्या चालू वर्षीच्या बांधकाम विभागला ५० कोटींचे नियतव्यय आले आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य व महिला बालकल्याण विभाग मिळून जवळपास १०० कोटी, त्यामुळे हा आकडा १५० कोटींपर्यत असू शकतो. यातून आचारसंहितेपूर्वी जास्तीत जास्त कामे मंजूर केली जाणार आहेत. यात ३०५४, ५०५४, आदींसह तीर्थक्षेत्र विकास, शाळाखोल्या बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम व अन्य कामांचा समावेश आहे. त्याअनुषंगाने कामे मंजुरीसाठी सर्वच मतदारसंघांतील विद्यमान आमदार आणि त्यांची यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या जिल्हा परिषदेत पदाधिकारी, सदस्य नसल्याने विकासकामांच्या मंजुरीत सामान्य गावांना गरज असूनही कामे होऊ शकत नाही. प्रशासनाने स्वतः ग्राऊंडवर उतरून प्राधान्याने कामे मंजूर करायला हवीत, ज्यामुळे ग्रामीण भागातील निकडीची विकासकामे होऊ शकतात. यानुसार कामे होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती