शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 20:18 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा झळ पोहोचली आहे.

- संदीप मानकरअमरावती : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा झळ पोहोचली आहे. यापैकी तीन जिल्ह्यांतील मोठे व मध्यम अशा एकूण आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या धरणांचाही समावेश आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठ्या धरणांचा समावेश आहे. पेनटाकळी प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ५९.९७ दलघमी आणि खडकपूर्णा धरणाचा ९३.४० दलघमी आहे. पण, आजचा उपयुक्त पाणीसाठा हा शून्य दलघमी आहे. त्या कारणाने या जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मागील वर्षी धरण परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.सहा मध्यम प्रकल्पांची परिस्थितीसुद्धा चिंताजनक आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. घुंगशी बॅरेजमध्येसुद्धा यंदा पाणी नाही. वाशिम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्प, बुलडाणा जिल्ह्यातील मस धरण, कोराडी व तोरणा धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.------------काही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा हा शून्य टक्क्यांवर आला आहे. धरण पूर्ण झाले असले तरी उर्वरित इतर कामांना सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग