शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा जोडण्यासाठी 'वीरुगिरी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 13:17 IST

महावितरणकडून होत असलेली वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबविण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ‘शोले’ आंदोलन केले.

ठळक मुद्देवीज तोडणीला स्थगिती देण्याची मागणी

अमरावती : महावितरणकडून होत असलेली वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबविण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ‘शोले’ आंदोलन केले. मोबाईल टॉवरवर उंचावर त्यांनी ठाण मांडले. पोलिसांनी मागण्या मान्य होण्यापूर्वी खाली उतरविण्याचा प्रयत्न केल्यास उडी घेऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. सायंकाळी एक महिन्याच्या मुदतीच्या आश्वासनावर ते खाली उतरले.

आधीच चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना सन २०१९ पासून कोरोनाने सर्व काही संपविले. अशा बिकट परिस्थितीत जीवन कसे जगायचे, ही काळजी असताना महावितरणकडून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती करीत जबरीने वसुली करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या मोहिमेला स्थगिती मिळावी, ही वसुली मेनंतर सुरू करावी, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २ फेब्रवारी रोजी सकाळपासून अंजनगाव सुर्जी येथील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. युवा स्वाभिमानचे मंगेश कोकाटे, विठ्ठल ढोले, अजय देशमुख हे टॉवरवर चढून बसले.

ज्यांनी बिलाचा भरणा अद्याप केलेला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा त्वरित चालू करून करावी, वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवू. त्यापूर्वी पोलीस प्रशासनाने आम्हाला उतरविण्यासाठी पाऊल उचलले, तर आम्ही टॉवरवरून उडी घेऊ, अशा प्रतिक्रिया टॉवरवर चढलेल्या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली. आंदोलनस्थळी सकाळपासूनच युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सहायक उपनिरीक्षक विशाल पोळकर व इनामदार यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, सहायक अभियंता संदीर गुजर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. आधी आठ दिवसांची मुदत नाकारल्यानंतर त्यांनी वीज बिल भरण्यास एक महिन्याची मुदत दिली. त्यावर समाधान मानत आंदोलक सायंकाळी ६ च्या सुमारास टॉवरवरून उतरले.

एक महिन्यापर्यंत कुठलेही कनेक्शन बंद करण्यात येणार नाही. त्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना पाच हजार रुपये तातडीने भरावे लागतील.

- संदीप गुजर, सहायक अभियंता

शेतकरी अस्मानी संकटांमुळे हैराण झाला आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकार ता शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कापत आहे. त्यामुळे युवा स्वाभिमानला शेतकऱ्यांच्या हितार्थ आंदोलन करावे लागले. वीजपुरवठा खंडित करणे बंद केले नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील.

- रवि राणा, आमदार, बडनेरा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीजagitationआंदोलन