शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

टायर फुटलेल्या कारचा भीषण अपघात, तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिता  हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर :  दर्यापूरहून गावी अंजनगावसुर्जी येथे जात असताना चारचाकीचा टायर फुटून  झालेल्या अपघातात अनियंत्रित झालेल्या कारमधील १७ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली. तिचे आई-वडील व कारने धडक दिलेल्या अन्य दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार दुपारी साडेचार वाजता तालुक्यातील इटकी फाट्यानजीक घडली.अर्पिता  राजेश गिरी (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. राजेश त्र्यंबक गिरी (४७), रेखा राजेश गिरी (४०, तिघेही रा. अंजनगाव सुर्जी) हे दाम्पत्य तसेच  विशाल गजानन सोळंके  (२८), प्रतीक्षा विशाल सोळंके  (२३, दोघेही रा. घोंडसगाव, ता. अंजनगाव सुर्जी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिता  हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिचे आई-वडील तसेच  दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी मृत तरुणी  व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले. यानंतर चारही जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. वृत्त लिहिस्तोवर तेथील पोलीस ठाण्याने पंचनामा सुरू केला होता.

 

टॅग्स :Accidentअपघात