शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टायर फुटलेल्या कारचा भीषण अपघात, तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिता  हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर :  दर्यापूरहून गावी अंजनगावसुर्जी येथे जात असताना चारचाकीचा टायर फुटून  झालेल्या अपघातात अनियंत्रित झालेल्या कारमधील १७ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली. तिचे आई-वडील व कारने धडक दिलेल्या अन्य दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार दुपारी साडेचार वाजता तालुक्यातील इटकी फाट्यानजीक घडली.अर्पिता  राजेश गिरी (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. राजेश त्र्यंबक गिरी (४७), रेखा राजेश गिरी (४०, तिघेही रा. अंजनगाव सुर्जी) हे दाम्पत्य तसेच  विशाल गजानन सोळंके  (२८), प्रतीक्षा विशाल सोळंके  (२३, दोघेही रा. घोंडसगाव, ता. अंजनगाव सुर्जी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिता  हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिचे आई-वडील तसेच  दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी मृत तरुणी  व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले. यानंतर चारही जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. वृत्त लिहिस्तोवर तेथील पोलीस ठाण्याने पंचनामा सुरू केला होता.

 

टॅग्स :Accidentअपघात