शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तुम्ही वाहनाचे कर्ज फेडले; एनओसी कोण घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:09 IST

Amravati : कागदपत्रावरील कर्जाचा बोजा कमी करणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहन कर्जावर घेतले असल्यास ते कर्ज परतफेड केल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेऊन वाहनाच्या कागदपत्रावरील कर्जाचा बोजा कमी करणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात शेकडो वाहनधारकांनी कर्ज फेडूनही त्यांच्या नावावर बोजा नोंद असल्याचे चित्र आहे. अनेकजण वाहन खरेदी करण्यासाठी वाहन कर्ज घेतात. वाहन खरेदीसाठी अनेक वित्तीय कंपन्याही सवलतीच्या दरात व्याज देतात. बेसिक कार, प्रीमियम आणि लक्झरी कारही कर्जामुळे घेणे शक्य होते. दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे मुदतीचा कर्जाचा कालावधी आहे. मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित वाहनावरील कर्जाचा बोजा कमी केला जात आहे. ज्या वाहनावर कर्जाचा बोजा आहे, अशा वाहनाचे हस्तांतरण करण्यासाठी अथवा वाहनावरील तारणबोजा उतरवण्यासाठी वित्तदात्याची एनओसी आवश्यक असते.

कर्जाची परतफेड केल्यानंतर काय कराल..?आरटीओकडे जमा करा. वाहन कर्ज पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. न झाल्यास वाहन विक्री आणि वाहन चोरीला गेल्यास अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी योग्य वेळी दक्षता घेणे गरजेचे आहे.

कर्जाची परतफेड करताना ही काळजी घ्या?आरटीओकडे जमा करा एचपी रिमूव्हल म्हणजे तुमच्या आर. सी. बुकवरून तुमच्या बँकेचा तपशील काढून टाकावा लागतो. हे काम पूर्ण न केल्यास आरटीओत तुमच्या नावावर कारची नोंद होणार नाही.

बँकेकडून एनओसी घ्या... कर्ज संपल्यानंतर बँकांकडून एनओसी घेऊन आरटीओत प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहन कर्ज फेडल्यानंतर आणि बँकेकडून एनओसी घेतल्यानंतर आरटीओतून एचपी करणे आवश्यक

गाडीवरील कर्जाचा भार कमी करा. कर्जाचा भार कमी केल्याशिवाय वाहनांचे हस्तांतरण होत नाही. विक्री करता येत नाही.

कर्ज फेडूनही अनेक गाड्यांचा कागदपत्रावर भारबँकेकडून घेतलेली एनओसीची मुदत ही तीन महिन्यांसाठी असते. ही मिळाल्यानंतर आरटीओ कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तीन महिन्यांत 'एनओसी' जमा केली नसल्यास ती पुन्हा काढावी लागते, त्यासाठी सध्या काही बँकांनी 'एनओसी'चे दरही वाढवले आहेत.

"मोटार वाहन कायद्यानुसार ज्या वाहनावर कर्जाचा बोजा आहे, अशा वाहनाचे हस्तांतरण करण्यासाठी अथवा वाहनावरील तारणबोजा उतरवण्यासाठी वित्तदात्याची एनओसी आवश्यक असते."- प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती