शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

यंदा ‘म्हैस भिजणार पावसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:58 IST

अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा पंचागकर्त्यांचा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा पंचागकर्त्यांचा अंदाज आहे. जिल्ह्यात १० जूननंतर पावसाला व १५ जूननंतर मान्सूनला प्रारंभ होण्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज असल्याने शेतकरी सुखावला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात १५ ते २० हजार हेक्टरने घट होऊन किमान २८ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची क्षेत्रवाढ होऊ शकते, असे कृषी विभागाने सांगितले. प्रस्तावित क्षेत्रानुसार यंदा कपाशीचे दोन लाख ६१ हजार हेक्टर, सोयाबीन दोन लख ६८ हजार हेक्टर, तूर एक लाख १० हजार हेक्टर, मूग ३० हजार हेक्टर, ज्वारी ३० हजार हेक्टर, उदीड १० हजार हेक्टर, मका नऊ हजार हेक्टर व इतर पिकासाठी नऊ हजार ६१२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत बियाणे व खतांची उपलब्धता असली तरी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास घरचे सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासून व बीजप्रक्रिया करून पेरणी करावी व साधारणपणे ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पाऊस मुरल्याची खात्री करून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने विभागाने केले आहे.

१० जूननंतर वाढणार पावसाचे प्रमाणश्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते १० जूननंतर जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या परिस्थितीमुळे यंदा मान्शूनचे आगमन मुंबईऐवजी आंध्रप्रदेशाकडून होण्याची शक्यता आहे.

‘लॉकडाऊन’ मुळावरखासगी बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमीने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी पणन अन् सीसीआयची आस धरली, नोंदणीच्या शनिवार या अखेरच्या दिवसांपर्यंत अद्याप २४ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस खरेदी व्हायची आहे. अडीच महिन्यांपासून सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे

पीककर्जास बँकांची ‘ना’बँकांचा पीककर्ज वाटपाचा टक्का १० वरच अडकलेला आहे.जिल्ह्यात १.३१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मात्र, हे सर्व शेतकरी थकबाकीदार आहेत. कर्जमाफीतील दोन लाखांच्या कर्जाची शासनाने हमी घेतली. आदेश जारी केलेत. तरीही बँका जुमानत नसल्याने बी-बियाण्यांची तजविज कुठून करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Rainपाऊस