शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

यंदा ‘म्हैस भिजणार पावसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:58 IST

अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा पंचागकर्त्यांचा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा पंचागकर्त्यांचा अंदाज आहे. जिल्ह्यात १० जूननंतर पावसाला व १५ जूननंतर मान्सूनला प्रारंभ होण्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज असल्याने शेतकरी सुखावला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात १५ ते २० हजार हेक्टरने घट होऊन किमान २८ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची क्षेत्रवाढ होऊ शकते, असे कृषी विभागाने सांगितले. प्रस्तावित क्षेत्रानुसार यंदा कपाशीचे दोन लाख ६१ हजार हेक्टर, सोयाबीन दोन लख ६८ हजार हेक्टर, तूर एक लाख १० हजार हेक्टर, मूग ३० हजार हेक्टर, ज्वारी ३० हजार हेक्टर, उदीड १० हजार हेक्टर, मका नऊ हजार हेक्टर व इतर पिकासाठी नऊ हजार ६१२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत बियाणे व खतांची उपलब्धता असली तरी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास घरचे सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासून व बीजप्रक्रिया करून पेरणी करावी व साधारणपणे ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पाऊस मुरल्याची खात्री करून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने विभागाने केले आहे.

१० जूननंतर वाढणार पावसाचे प्रमाणश्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते १० जूननंतर जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या परिस्थितीमुळे यंदा मान्शूनचे आगमन मुंबईऐवजी आंध्रप्रदेशाकडून होण्याची शक्यता आहे.

‘लॉकडाऊन’ मुळावरखासगी बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमीने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी पणन अन् सीसीआयची आस धरली, नोंदणीच्या शनिवार या अखेरच्या दिवसांपर्यंत अद्याप २४ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस खरेदी व्हायची आहे. अडीच महिन्यांपासून सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे

पीककर्जास बँकांची ‘ना’बँकांचा पीककर्ज वाटपाचा टक्का १० वरच अडकलेला आहे.जिल्ह्यात १.३१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मात्र, हे सर्व शेतकरी थकबाकीदार आहेत. कर्जमाफीतील दोन लाखांच्या कर्जाची शासनाने हमी घेतली. आदेश जारी केलेत. तरीही बँका जुमानत नसल्याने बी-बियाण्यांची तजविज कुठून करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Rainपाऊस