शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

यंदा ‘म्हैस भिजणार पावसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:58 IST

अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा पंचागकर्त्यांचा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा पंचागकर्त्यांचा अंदाज आहे. जिल्ह्यात १० जूननंतर पावसाला व १५ जूननंतर मान्सूनला प्रारंभ होण्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज असल्याने शेतकरी सुखावला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात १५ ते २० हजार हेक्टरने घट होऊन किमान २८ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची क्षेत्रवाढ होऊ शकते, असे कृषी विभागाने सांगितले. प्रस्तावित क्षेत्रानुसार यंदा कपाशीचे दोन लाख ६१ हजार हेक्टर, सोयाबीन दोन लख ६८ हजार हेक्टर, तूर एक लाख १० हजार हेक्टर, मूग ३० हजार हेक्टर, ज्वारी ३० हजार हेक्टर, उदीड १० हजार हेक्टर, मका नऊ हजार हेक्टर व इतर पिकासाठी नऊ हजार ६१२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत बियाणे व खतांची उपलब्धता असली तरी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास घरचे सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासून व बीजप्रक्रिया करून पेरणी करावी व साधारणपणे ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पाऊस मुरल्याची खात्री करून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने विभागाने केले आहे.

१० जूननंतर वाढणार पावसाचे प्रमाणश्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते १० जूननंतर जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या परिस्थितीमुळे यंदा मान्शूनचे आगमन मुंबईऐवजी आंध्रप्रदेशाकडून होण्याची शक्यता आहे.

‘लॉकडाऊन’ मुळावरखासगी बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमीने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी पणन अन् सीसीआयची आस धरली, नोंदणीच्या शनिवार या अखेरच्या दिवसांपर्यंत अद्याप २४ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस खरेदी व्हायची आहे. अडीच महिन्यांपासून सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे

पीककर्जास बँकांची ‘ना’बँकांचा पीककर्ज वाटपाचा टक्का १० वरच अडकलेला आहे.जिल्ह्यात १.३१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मात्र, हे सर्व शेतकरी थकबाकीदार आहेत. कर्जमाफीतील दोन लाखांच्या कर्जाची शासनाने हमी घेतली. आदेश जारी केलेत. तरीही बँका जुमानत नसल्याने बी-बियाण्यांची तजविज कुठून करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Rainपाऊस