शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

यंदाच्या दिवाळीत पेटणार जुन्याच कापसाच्या वाती

By admin | Updated: October 22, 2014 23:11 IST

जिल्ह्यात रबीसाठी ७ लाख २० हजार पेरणीक्षेत्र आहे. यापैकी २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. मात्र दीड महिना उशिरा पाऊस, पावसाचा खंड व सध्या कपाशीवर असलेला पोटऱ्या माशीचा

अमरावती : जिल्ह्यात रबीसाठी ७ लाख २० हजार पेरणीक्षेत्र आहे. यापैकी २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. मात्र दीड महिना उशिरा पाऊस, पावसाचा खंड व सध्या कपाशीवर असलेला पोटऱ्या माशीचा प्रादुर्भाव व लाल्यामुळे कपाशीचे पीकच धोक्यात आले आहे. यावेळेपर्यंत किमान २ ते ३ वेचाई होतात. यंदा मात्र कपाशीची पहिलीच वेचाई (सीतादही) झालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या आनंदात विरजण पडले आहे. या विपरीत स्थितीत दिवाळीला बळीराजाच्या घरी पेटविल्या जाणाऱ्या पणतीत जुन्याच कापसाच्या वाती राहणार आहेत.जिल्ह्यात रबीची पेरणी जून महिन्यात होते. यावर्षी मात्र आॅगस्ट अखेरपावेतो पावसाचा पत्ताच नव्हता परिणामी सप्टेंबरपर्यंत ७ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली यापैकी ३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीन व २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. यंदाचे सोयाबीन निकृष्ट बियाणे, पिवळा मोझॅकचा अटॅक यामुळे शेंगा पोचट होऊन पूर्णत: व्यर्थ गेले. नगदी पीक (कॅश क्रॅप) हातचे गेल्याने आधीच शेतकरी संकटात आला. किमान कपाशी साथ देईल, अशी अपेक्षा असताना दिवसाचे उष्णतामान, रात्रीची थंडी, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे त्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. आधीच ४५ दिवस उशिरा झालेली पेरणी यामुळे कपाशीचे २ ते ३ वेळा वेचाई होण्याच्या काळात कपाशी पात्या फुलावर आहे. या कपाशीवर प्रतिकूल हवामान अन्नद्रव्याची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रसशोषण करणाऱ्या किडीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कपाशीचे बोंड पूर्णत: उघडत नाही व निघणारी रूईदेखील निकृष्ट दर्जाची राहणार आहे. यामुळे सरासरी उत्पन्नात किमान ५० टक्क्यांनी घट येणार आहे.