शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

जगाला युद्ध नकोच; बुद्ध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:53 IST

महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वाचनालय व रमाई महिला मंडळ दुरगडाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वाचनालय व रमाई महिला मंडळ दुरगडाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाटचे अध्यक्ष अनिल जवादे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भदन्त राजरत्न, विशाल मानकर, पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, मुकुंद नाखले, सुनील ढाले यांची उपस्थिती होती.राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी काम केले. जगातला मानवतावादी धम्म दिला. जो मानवा मानवामध्ये भेद न करता मानवा मानवाला जोडतो. त्यांनी १४ आॅक्टोबर १९५६ ला नागाच्या नागभूमित बौद्ध धम्माची दिक्षा दिली. तो कल्याणाचा धम्म प्रत्येक बौद्धांनी आत्मसात करून धम्माचा प्रचाार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. कारण धम्म कितीही चांगला असेल; पण त्याचा प्रचार आणि प्रसार करणारेच नसतील तर तो धम्म नष्ट पण होवू शकतो. यासाठी प्रत्येक बौद्ध बांधवांनी धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम करावे, असे त्यांनी सांगितले.अनिल जवादे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या मातृसंघटना भारतीय बौद्ध महासभेचे सभासद होवून धम्म चळवळ अधिक बळकट करावी असे आवाहन केले. तर भदन्त राजरत्न यांनी बुद्धाचा धम्म आधी, मध्य आणि अंतही कल्याणकारी आहे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमात ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात चंद्रशेखर भुजाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद नाखले यांनी केले. संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार चंद्रशेखर भुजाडे यांनी मानले. त्यानंतर आशीषकुमार मून व वैशाली कांबळे यांचा बुद्ध व भीम गितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत संयोजक जयंत फुलझेले, नारायण चिकराम, गौरव डबले, नितेश मून, ज्ञानोबा थूल, दिलीप शेंडे, योगिराज बागेश्वर, सुधाकर आत्राम, रामभाऊ निरगुडे, सुरज मून, प्रशिल तेलतुंंबडे, प्रशिल पाटील, चंदू ढाले, रमाई महिला मंडळ भिडी आदींनी सहकार्य केले.