शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे काम कासवगतीने

By admin | Updated: September 7, 2015 00:27 IST

अप्पर वर्धा धरणाशेजारी असलेल्या राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या पुनरुज्जीवनाचे संथ गतीने सुरु असलेल्या ...

जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी : कामाला गती देण्याचे निर्देशमोर्शी : अप्पर वर्धा धरणाशेजारी असलेल्या राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या पुनरुज्जीवनाचे संथ गतीने सुरु असलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी नाराजी व्यक्त करीत कामाला गती देण्याचे निर्देश संबंधितांना दिले. अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीनंतर धरणातून मासेमारी व्हावी, याशिवाय पश्चिम विदर्भातील लहान मोठ्या तलावातून मत्स्यउत्पादन व्हावे यासाठी लागणाऱ्या मत्स्यबीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याच्या उद्देशाने तत्कालीन शासनाने राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राची निर्मिती धरणाशेजारी असलेल्या नशिरपूर शिवारात केली होती. यासाठी ३३ हेक्टर जमीन अधिग्रहण करून त्यावर मत्स्यबीजाचे १०० संगोपन तळे आणि १० संचयन तळ्यांची निर्मिती करण्यात आली होती. निर्मितीपासून आजतागायत पूर्ण क्षमतेने या केंद्रातून उत्पादन सुरूच झाले नाही. दरम्यान, मत्स्य व्यवसाय विभागाच्या दुर्लक्षामुळे या महत्त्वपूर्ण केंद्राला अवकळा आली होती. लक्षावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या तळ्यांत मोठे वृक्ष उभे झाले आणि तळे निकामी झाले. दरम्यान राज्य शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणानुसार, येथील राष्ट्रीय मत्स्यबीज केंद्रसुध्दा खासगी व्यक्तीकडे जाण्याची शक्यता पाहून जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ. अनिल बोंडे यांनी येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या पुनरुज्जीवनाकडे विशेषत्वे करुन लक्ष दिले. त्यांनी पुनरुज्जीवनाकरिता मत्स्यव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर केला आणि शासनाकडून ३० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून घेतला. हा निधी संबंधित विभागाला जानेवारी २०१५ मध्येच दिला होता. मात्र कामाला गती आली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस आले. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राला भेट देऊन पुनरुज्जीवनाच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक संचालक दीक्षित, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भामरे, खुल्या कारागृहाचे अधीक्षक जगताप, येथील उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, नल दमयंती सागर मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे उपस्थित होते. मत्स्यबिज संगोपन तळ्यांमध्ये वाढलेल्या बाभळी व इतर वृक्ष काढून टाकण्यासाठी येथील खुल्या कारागृहातील बंदीजनांची मदत घेण्याचे, पर्यायाने त्यांना रोजगार प्राप्त करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. अप्पर वर्धा धरणात झिंग्याचे बीज सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी विशद केले.