शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महिला दक्षता समिती करणार समुपदेशन !

By admin | Updated: September 21, 2015 00:03 IST

महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध एनजीओ, पोलीस ठाण्यांतील समुपदेशन केंद्र, महिला दक्षता समिती, जिल्हा परिषदेतील समुपदेशन केंद्र, ...

उच्च न्यायालयाचा निर्वाळा : कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील परिपत्रक रद्दअमरावती : महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध एनजीओ, पोलीस ठाण्यांतील समुपदेशन केंद्र, महिला दक्षता समिती, जिल्हा परिषदेतील समुपदेशन केंद्र, कौटुंबिक समुपदेशन केंद्र किंवा इतर कोणत्याही समुपदेशन केंद्रातील समुपदेशकांना कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पीडित महिलेचे समुपदेशन करण्याची दारे पुन्हा उघडी झाली आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पीडित महिलेला न्यायालयाच्या आदेशानुसार अन्य कोणत्याही एजंसीने समुपदेशन करू नये असे २४ जुलै २०१४ रोजी शासनाने काढलेले परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबादल ठरविले आहे. त्यामुळे यापुढे कौटुंबिक हिंसाचारातील पीडित महिलेला न्यायालयाच्या कक्षेबाहेरही समुपदेशन करून उभारी देण्यावर एनजीओ व इतर केंद्रांवर असणारा मज्जाव यापुढे राहणार नाही. शासनाने २४ जुलै २०१४ रोजी परिपत्रक काढले होते यामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यात खटला दाखल केल्यानंतरच पीडित महिलेला समुपदेशन किंवा मध्यस्ती करता येणार आहे आणि तेही त्या खटल्यात न्यायालयाने समुपदेशन करण्याबाबत आदेश दिल्यानंतर न्यायालयीन समुपदेशन करण्याबाबतचा आदेश दिल्यानंतरच हे शक्य आहे. हे समुपदेशन न्यायालयातील समुपदेशक व मध्यस्ती न्यायालयाच्या आदेशाशिवाय केल्यास कायद्याचे उल्लंघन मानले जाईल, असे सांगण्यात आले होते. या परिपत्रकाविरूद्ध एका विधी महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राच्या संचालिकेने जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत एनज्सीने केवळ माहिती देणे आणि न्यायालयाविषयी सांगणे म्हणजे त्यांचे काम केवळ ‘संदर्भ’ देण्याचेच उरेल, कित्येक महिलांना केवळ कोर्ट कचेऱ्या करायच्या नसतात, त्यांना योग्य रितीने सल्ला देण्याचे काम एनजीओच करू शकतात. त्यामुळे एनजीओ व इतर समुपदेशन केंद्रांच्या समुपदेशनावर बंदी आणणे चुकीचे ठरेल. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहित शहा व रोशन दळवी यांच्या खंडपीठाने २४ जुलै २०१४ चे परिपत्रक हे भेदभाव अनियंत्रित व अवास्तव असल्याचे नमूद करीत ते रद्दबातल ठरविले आहे.असा आहे याचिकेचा संदर्भएजन्सीने केवळ महिलांना माहिती देणे आणि न्यायालयाविषयी सांगणे म्हणजे त्यांचे काम केवळ संदर्भ देण्याचे उरेल, मुळात अनेक एजन्सी अशा आहेत, ज्या महिलांसाठीचा कायदा अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपासून पीडितांचे समुपदेशन करतात. मुळात पीडित महिलेला तिच्या हक्काविषयी सांगणे, हा छोटा भाग आहे. परंतु तिला स्वत: उभे राहण्यासाठी उभारी देणे, हिंसेपासून बचाव करणे महत्त्वाचे आहे. अनेक महिलांना कोर्ट-कचेऱ्या करायच्या नसतात. त्यामुळे एनजीओ व इतर समुपदेशन केंद्रांच्या समुपदेशनावर बंदी घालणे चुकीचे ठरेल. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १४ जुलैचे परिपत्रक रद्दबातल ठरविल्याने कौटुंबिक हिंसाचारामध्ये पीडित महिलेला आता एनजीओ व इतर एजन्सीच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येता येणार आहे. दिलासा देणारा हा निर्णय आहे. - स्वप्निल मोहोड, अभियोक्ता, अमरावती.