शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

महिला दक्षता समिती करणार समुपदेशन !

By admin | Updated: September 21, 2015 00:03 IST

महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध एनजीओ, पोलीस ठाण्यांतील समुपदेशन केंद्र, महिला दक्षता समिती, जिल्हा परिषदेतील समुपदेशन केंद्र, ...

उच्च न्यायालयाचा निर्वाळा : कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील परिपत्रक रद्दअमरावती : महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध एनजीओ, पोलीस ठाण्यांतील समुपदेशन केंद्र, महिला दक्षता समिती, जिल्हा परिषदेतील समुपदेशन केंद्र, कौटुंबिक समुपदेशन केंद्र किंवा इतर कोणत्याही समुपदेशन केंद्रातील समुपदेशकांना कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पीडित महिलेचे समुपदेशन करण्याची दारे पुन्हा उघडी झाली आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पीडित महिलेला न्यायालयाच्या आदेशानुसार अन्य कोणत्याही एजंसीने समुपदेशन करू नये असे २४ जुलै २०१४ रोजी शासनाने काढलेले परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबादल ठरविले आहे. त्यामुळे यापुढे कौटुंबिक हिंसाचारातील पीडित महिलेला न्यायालयाच्या कक्षेबाहेरही समुपदेशन करून उभारी देण्यावर एनजीओ व इतर केंद्रांवर असणारा मज्जाव यापुढे राहणार नाही. शासनाने २४ जुलै २०१४ रोजी परिपत्रक काढले होते यामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यात खटला दाखल केल्यानंतरच पीडित महिलेला समुपदेशन किंवा मध्यस्ती करता येणार आहे आणि तेही त्या खटल्यात न्यायालयाने समुपदेशन करण्याबाबत आदेश दिल्यानंतर न्यायालयीन समुपदेशन करण्याबाबतचा आदेश दिल्यानंतरच हे शक्य आहे. हे समुपदेशन न्यायालयातील समुपदेशक व मध्यस्ती न्यायालयाच्या आदेशाशिवाय केल्यास कायद्याचे उल्लंघन मानले जाईल, असे सांगण्यात आले होते. या परिपत्रकाविरूद्ध एका विधी महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राच्या संचालिकेने जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत एनज्सीने केवळ माहिती देणे आणि न्यायालयाविषयी सांगणे म्हणजे त्यांचे काम केवळ ‘संदर्भ’ देण्याचेच उरेल, कित्येक महिलांना केवळ कोर्ट कचेऱ्या करायच्या नसतात, त्यांना योग्य रितीने सल्ला देण्याचे काम एनजीओच करू शकतात. त्यामुळे एनजीओ व इतर समुपदेशन केंद्रांच्या समुपदेशनावर बंदी आणणे चुकीचे ठरेल. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहित शहा व रोशन दळवी यांच्या खंडपीठाने २४ जुलै २०१४ चे परिपत्रक हे भेदभाव अनियंत्रित व अवास्तव असल्याचे नमूद करीत ते रद्दबातल ठरविले आहे.असा आहे याचिकेचा संदर्भएजन्सीने केवळ महिलांना माहिती देणे आणि न्यायालयाविषयी सांगणे म्हणजे त्यांचे काम केवळ संदर्भ देण्याचे उरेल, मुळात अनेक एजन्सी अशा आहेत, ज्या महिलांसाठीचा कायदा अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपासून पीडितांचे समुपदेशन करतात. मुळात पीडित महिलेला तिच्या हक्काविषयी सांगणे, हा छोटा भाग आहे. परंतु तिला स्वत: उभे राहण्यासाठी उभारी देणे, हिंसेपासून बचाव करणे महत्त्वाचे आहे. अनेक महिलांना कोर्ट-कचेऱ्या करायच्या नसतात. त्यामुळे एनजीओ व इतर समुपदेशन केंद्रांच्या समुपदेशनावर बंदी घालणे चुकीचे ठरेल. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १४ जुलैचे परिपत्रक रद्दबातल ठरविल्याने कौटुंबिक हिंसाचारामध्ये पीडित महिलेला आता एनजीओ व इतर एजन्सीच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येता येणार आहे. दिलासा देणारा हा निर्णय आहे. - स्वप्निल मोहोड, अभियोक्ता, अमरावती.