शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पोहऱ्यात पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:37 IST

अमरावती-चांदूर रेल्वे मार्गातील पोहराबंदी या गावातील ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

ठळक मुद्देवीजपुरवठा कापला : ग्रामपंचायतचा उदासीन कारभार

अमोल कोहळे।ऑनलाईन लोकमतपोहराबंदी : अमरावती-चांदूर रेल्वे मार्गातील पोहराबंदी या गावातील ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गेल्या २० दिवसांपासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.साडेतीन ते चार हजार लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीचे एक बोअरवेल कनेक्शन असून, ग्रामपंचायतीवर सात लाख रुपये थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने गावकरी दररोज पायपीट करून पाणी आणत आहेत. गावातील हातपंप बंद अवस्थेत आहेत. याआधी गावात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होते. पण, आता विद्युत विभागाने कनेक्शन खंडित केल्याने चक्क २० दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. विहिरीच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. या विहिरीत केरकचरा साचल्याने पाणी दूषित झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे विहिरीच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी उपाययोजना होत नसल्याने गावात साथीची लागण होण्याची शक्यता आहे. पाणी मुबलक असून ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे २० दिवसांपासून विहिरीवरुन पाणी आणण्याकरिता नागरिकांना पायपीट सहन करावी लागत आहे. नागरिकांना उन्हात भरधाव वाहने जात असताना राज्य महामार्ग ओलांडून पाण्याची तजवीज करावी लागत आहे.काही नागरिकांकडे पाणीपट्टी कर थकित आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे देयक भरण्यास अडचण निर्माण झाली. नागरिकांनी थकित करावा व सहकार्य करावे.- संजय शिंदेउपसरपंच पोहराबंदीगावकरी सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणत आहेत. त्या विहिरीत २० दिवसांपासून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. त्यामुळे पाण्यामार्फत गावात साथीची लागण होण्याची शक्यता आहे.- हारुण शाह,माजी ग्रामपंचायत सदस्य

टॅग्स :Waterपाणी