शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पोहऱ्यात पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:37 IST

अमरावती-चांदूर रेल्वे मार्गातील पोहराबंदी या गावातील ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

ठळक मुद्देवीजपुरवठा कापला : ग्रामपंचायतचा उदासीन कारभार

अमोल कोहळे।ऑनलाईन लोकमतपोहराबंदी : अमरावती-चांदूर रेल्वे मार्गातील पोहराबंदी या गावातील ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गेल्या २० दिवसांपासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.साडेतीन ते चार हजार लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीचे एक बोअरवेल कनेक्शन असून, ग्रामपंचायतीवर सात लाख रुपये थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने गावकरी दररोज पायपीट करून पाणी आणत आहेत. गावातील हातपंप बंद अवस्थेत आहेत. याआधी गावात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होते. पण, आता विद्युत विभागाने कनेक्शन खंडित केल्याने चक्क २० दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. विहिरीच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. या विहिरीत केरकचरा साचल्याने पाणी दूषित झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे विहिरीच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी उपाययोजना होत नसल्याने गावात साथीची लागण होण्याची शक्यता आहे. पाणी मुबलक असून ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे २० दिवसांपासून विहिरीवरुन पाणी आणण्याकरिता नागरिकांना पायपीट सहन करावी लागत आहे. नागरिकांना उन्हात भरधाव वाहने जात असताना राज्य महामार्ग ओलांडून पाण्याची तजवीज करावी लागत आहे.काही नागरिकांकडे पाणीपट्टी कर थकित आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे देयक भरण्यास अडचण निर्माण झाली. नागरिकांनी थकित करावा व सहकार्य करावे.- संजय शिंदेउपसरपंच पोहराबंदीगावकरी सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणत आहेत. त्या विहिरीत २० दिवसांपासून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. त्यामुळे पाण्यामार्फत गावात साथीची लागण होण्याची शक्यता आहे.- हारुण शाह,माजी ग्रामपंचायत सदस्य

टॅग्स :Waterपाणी