शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

पक्षबदलाचे वारे; मुस्लिम, दलित मतांचे विभाजन

By admin | Updated: October 7, 2014 23:27 IST

गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले तसेच पक्षाकडून विविध पदे मिळविलेल्या जिल्ह्यातील विशेषत: चांदूरबाजार तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी एका रात्रीत पक्षनिष्ठेला

सुरेश सवळे - चांदूरबाजारगेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले तसेच पक्षाकडून विविध पदे मिळविलेल्या जिल्ह्यातील विशेषत: चांदूरबाजार तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी एका रात्रीत पक्षनिष्ठेला तिलांजली दिली. हे सर्व करताना त्यांनी त्यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी अहोरात्र सतरंज्या उचलणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनाही वाऱ्यावर सोडले. पक्षबदलाच्या या वावटळीत मुस्लिम-दलित मतांचे विभाजन होण्याची चिन्हे आहेत. गत निवडणुकीत युती व आघाडी सोबतीने लढल्यामुळे अकस्मात स्वतंत्र लढण्याची वेळ आली आणि त्यांच्याजवळही सर्वच जागांसाठी प्रबळ उमेदवार नव्हते. त्यामुळे इच्छुकांनी त्यांना उमदेवारी देणाऱ्या पक्षांची चाचपणी केली. इतर पक्षांनी युती-आघाडी दुभंगल्याने प्रबळ उमेदवारांचा शोध घेतला. यातच ज्या उमेदवारांचे पक्षाशी गुणसूत्र जुळले त्यांनी उमेदवारीसाठी पक्ष बदलला. अख्खे आयुष्य काँग्रेसमध्ये घालविणाऱ्या, विधान परिषद तसेच विधानसभेचे आमदार होऊन राज्यमंत्रिपद भूषविणाऱ्या अचलपूरच्या वसुधा देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी अचलपूर मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळविली. पक्षबदलाच्या या राजकारणामुळे कालपर्यंत ज्या पक्षात काम केले, त्याच पक्षाविरूध्द बोलताना हे उमेदवार किती प्रभावी ठरतात, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. हिंदुत्ववादी, सेक्युलर, अल्पसंख्यक, दलित, पाटील, देशमुख अशा वेगवेगळ्या व्होट बँकेचे राजकारण करून युती आणि आघाडीने सत्ता मिळविली. पण आता युती, आघाडी फुटल्यामुळे हे समीकरण बिघडले व मते कोणाला द्यावे, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असून विजयासाठीचा ताळेबंद मांडताना उमेदवारही चक्रावले आहेत. जिल्ह्यातील पाटील-देशमुख आणि दलित समाजही आजवर आघाडीच्या पाठीशी राहिला. आघाडी विस्कटल्यामुळे मतांचे विभाजन होणार, हे निश्चत आहे. काँग्रेस आघाडी आणि समाजवादी पक्षाची व्होट बँक समजली जाणाऱ्या मुस्लिम समाजाचा प्रभाव अचलपूर मतदारसंघात आहे. आघाडी फुटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंंगणात आहेत. त्यामुळे मुस्लिम व्होट बँकही विभागली जाण्याची शक्यता वर्तविली जात असून त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? याबाबत उमेदवारही संभ्रमात आहेत.