शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

अमरावतीकरांना यंदाही पाण्यासाठी मोजावे लागणार का पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:48 IST

Amravati : कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. शहराच्या चारही बाजूनी लोकवस्ती वाढल्याने नव्या निर्माण झालेल्या वसाहतीत आजही नळाचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आपली तहान ही नळाच्या पाण्याऐवजी बोअरवेलच्या पाण्यावर भागवावी लागत आहे.

विशेष म्हणजे, शहरी भागात नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा अप्पर वर्धा धरणातून केला जातो. त्यामुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा होतो, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांची तहान ही टँकरच्या पाण्यावर भागवावी लागते. टँकरद्वारे पाणीसाठा करण्यासाठी पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. तर शहरी भागात नव्याने अतित्वात आलेल्या वसाहतीमध्ये नळावाटे शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक नागरिक हे नळाच्या पाण्यासाठी लगतच्या परिसरात जाऊन पिण्याचे पाणी आणत लागते. 

१५०० रुपयांना टँकरखासगी टैंकर चालकांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच दर वाढविले आहेत. दोन हजार लिटरचा टँकर हवा असेल, तर किमान १००० ते १५०० रुपये मोजावे लागतात. घर लांब असेल, तर दरही तसेच वाढत जातात. विशेष म्हणजे पैसे मोजून टॅक्रर वेळेवर मिळत नाही.

उन्हाळ्यात पाण्यासारखे पैसे खर्च होणारजिल्ह्यातील मेळघाटसह अन्य काही तालुक्यांतील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा उन्हाळ्यात तीव्र होतात. यंदाही पाणीटंचाईचा सामना काही गावात करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच पाण्याकरिता पैसे खर्च होणार आहेत.

पाणी आले की लाईट गायबउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उकाड्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी थंडाव्यासाठी कूलर, पंखे, एसी आदी इलेक्ट्रिक उपकरणांचा उपयोग वाढतो.विजेची मागणी वाढताच अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. परिणामी ज्यावेळी पिण्याच्या पाण्याचे नळ येतात, नेमके त्याचवेळी वीजपुरवठाही गायब होते.

फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याला सुरुवातशहराच्या आसपास असलेल्या नवीन वसाहतीमध्ये पाण्याची मागणी वाढत आहे. नागरिक नळाच्या पाण्यासाठी पैसे मोजून पिण्याकरिता पाणी मागवितात. सध्या उन्हाळ्याच्या झळा जाणवत असल्याने आगामी कालावधीत पाण्याची समस्या गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळात पिण्याची टंचाई भासते. तर शहरी भागात दर दोनदिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. यात अनेक घरात टिल्लू मशिनचा वापर करून पाणी ओढल्या जाते. यावर मात्र मजीप्रा कुठलीही कारवाई करत नाही.

टोलेजंग इमारती, दर १५ फुटांवर बोअरसध्या शहरामध्ये पाच ते आठ मजल्यांपर्यंत टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ १५ फुटांच्या अंतरावर जमिनीमध्ये बोअर मारले असल्याने पाण्याची टंचाई जाणवते. एकाच ठिकाणी अनेक बोअर मारलेले असून यामुळे जमिनीची चाळण होऊन पाण्याची पातळी खोलवर जात असल्याचे दिसून येते. 

"शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. मात्र, नवीन वसाहतीमध्ये अद्यापही नळाचे पाणी पोहोचलेले नाही. परिणामी काही नागरिक बोअरच्या पाण्यावर तहान भागवितात. त्यामुळे अशा वसाहतीमध्ये नळावाटे पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे."- मोहन बैलके, नागरिक

"शहरातील काही भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने मोठी अडचण होते. त्यामुळे यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. याशिवाय नवीन वस्तीमध्ये नळाचे पाणी पोहोचणे आवश्यक आहे. नवीन वस्तीत नळ पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन पोहोचल्या नाहीत." - चंद्रशेखर मेहरे, नागरिक

टॅग्स :water shortageपाणीकपातAmravatiअमरावती