शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

पाेलिसांप्रमाणे ‘वन अधिकारी’ कायदा सुव्यवस्था सांभाळणार? कार्यकारी दंडाधिकारी पदासाठी प्रस्ताव

By गणेश वासनिक | Updated: September 2, 2022 16:50 IST

राज्यात वनांवर ताण वाढला

अमरावती : सीआरपीसी अंतर्गत वनाधिकाऱ्यांना वैधानिक संरक्षण प्रदान केलेले असल्याने महसूल व पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे वनाधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी पदाचा दर्जा बहाल केल्यास वन्यजीव संघर्ष प्रसंगी ‘कायदा सुव्यवस्था’ सांभाळण्याचे स्वातंत्र्य अधिकारामुळे वनाधिकाऱ्यांना मिळणार आहेत. तसा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.

दंडप्रक्रिया संहितेचे कलम ४ आणि ६ नुसार वनाधिकारी तपास यंत्रणा म्हणून काम करते. या विभागाचे स्वतंत्र असे कायदे आहेत. वनसंरक्षणाच्या दृष्टीने उद्धभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था प्रसंगी वनविभाग पोलिसांची मदत घेतो. मात्र अशा वेळी पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांकडून वनविभागास आवश्यक सहकार्य मिळत नाही. शिवाय वनसंरक्षण करते वेळी वनाधिकाऱ्यांनी शस्त्रांच्या बळाचा वापर केल्यास त्यांचे विरुद्ध सूड भावनेने दाखल होणारी फाैजदारी कारवाई टाळण्याकरिता, तसेच वनसंरक्षण करते वेळी निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी ते उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी या पदाचा दर्जा प्राप्त करुन देण्याबाबत सविस्तर कायदेशीर प्रस्ताव राज्याचे प्रधान मुख्यवनसंरक्षक सुनील लिमये यांनी राज्य शासनास सादर केला आहे. हा प्रस्ताव शासनाने मंजूर केल्यास वनाधिकारी यांना कार्यकारी दंडाधिकारी पदाचा बहुमान मिळणार आहे, हे विषेश.कायदेशीर अडचण नाही

दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४ व ५ नुसार वन्यजीव अपराध तपास करण्याचे अधिकार वन व पोलीस विभागास आहेत. या तपासात न्यायालय दोघांमध्ये भेद करीत नाही, परंतु वनाधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी पदाचा दर्जा प्राप्त नाही, असा दर्जा मिळाल्यास वनसंरक्षणाचे कामे अधिक प्रभावी पद्धतीने केले जाईल. असे करताना कायदा व सुव्यवस्थेची समस्या वनाधिकारी निकाली काढेल. त्यासाठी वनाधिकाऱ्यांना कुठलीही कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही.वनाधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले

अलीकडे वन्यजीव, वनस्पती, माैल्यवान खनिजे, अतिक्रमण, लाकूड , कंद मुळांची आंतरराष्ट्रीय तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. तस्करी रोखण्यासाठी आंतर राज्यीय मदत मिळत नाही, शासकीय कर्तव्य बजावत असताना वनाधिकाऱ्यांवर तस्करांकडून गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात हल्ले वाढलेले आहेत. वन्य प्राण्यांचा बचाव करताना लोकांच्या रोषाला वनाधिकारी बळी पडतात, जनसामान्यांच्या आक्रमक भूमिकांमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते, अशा वेळी ॲक्शन घेताना वनाधिकाऱ्यांना महसूल व पोलीस विभागांची मदत राहणार नाही. परिस्थिती नुसार ॲक्शन घेण्याचा स्वातंत्र्य अधिकारी वनाधिकाऱ्यास मिळणार आहेत.पोलिसांप्रमाणे वन अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. वने, वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे याविषयी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. - सुधीर मुनगंटीवार, वन मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार