शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

पाेलिसांप्रमाणे ‘वन अधिकारी’ कायदा सुव्यवस्था सांभाळणार? कार्यकारी दंडाधिकारी पदासाठी प्रस्ताव

By गणेश वासनिक | Updated: September 2, 2022 16:50 IST

राज्यात वनांवर ताण वाढला

अमरावती : सीआरपीसी अंतर्गत वनाधिकाऱ्यांना वैधानिक संरक्षण प्रदान केलेले असल्याने महसूल व पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे वनाधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी पदाचा दर्जा बहाल केल्यास वन्यजीव संघर्ष प्रसंगी ‘कायदा सुव्यवस्था’ सांभाळण्याचे स्वातंत्र्य अधिकारामुळे वनाधिकाऱ्यांना मिळणार आहेत. तसा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.

दंडप्रक्रिया संहितेचे कलम ४ आणि ६ नुसार वनाधिकारी तपास यंत्रणा म्हणून काम करते. या विभागाचे स्वतंत्र असे कायदे आहेत. वनसंरक्षणाच्या दृष्टीने उद्धभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था प्रसंगी वनविभाग पोलिसांची मदत घेतो. मात्र अशा वेळी पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांकडून वनविभागास आवश्यक सहकार्य मिळत नाही. शिवाय वनसंरक्षण करते वेळी वनाधिकाऱ्यांनी शस्त्रांच्या बळाचा वापर केल्यास त्यांचे विरुद्ध सूड भावनेने दाखल होणारी फाैजदारी कारवाई टाळण्याकरिता, तसेच वनसंरक्षण करते वेळी निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी ते उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी या पदाचा दर्जा प्राप्त करुन देण्याबाबत सविस्तर कायदेशीर प्रस्ताव राज्याचे प्रधान मुख्यवनसंरक्षक सुनील लिमये यांनी राज्य शासनास सादर केला आहे. हा प्रस्ताव शासनाने मंजूर केल्यास वनाधिकारी यांना कार्यकारी दंडाधिकारी पदाचा बहुमान मिळणार आहे, हे विषेश.कायदेशीर अडचण नाही

दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४ व ५ नुसार वन्यजीव अपराध तपास करण्याचे अधिकार वन व पोलीस विभागास आहेत. या तपासात न्यायालय दोघांमध्ये भेद करीत नाही, परंतु वनाधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी पदाचा दर्जा प्राप्त नाही, असा दर्जा मिळाल्यास वनसंरक्षणाचे कामे अधिक प्रभावी पद्धतीने केले जाईल. असे करताना कायदा व सुव्यवस्थेची समस्या वनाधिकारी निकाली काढेल. त्यासाठी वनाधिकाऱ्यांना कुठलीही कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही.वनाधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले

अलीकडे वन्यजीव, वनस्पती, माैल्यवान खनिजे, अतिक्रमण, लाकूड , कंद मुळांची आंतरराष्ट्रीय तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. तस्करी रोखण्यासाठी आंतर राज्यीय मदत मिळत नाही, शासकीय कर्तव्य बजावत असताना वनाधिकाऱ्यांवर तस्करांकडून गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात हल्ले वाढलेले आहेत. वन्य प्राण्यांचा बचाव करताना लोकांच्या रोषाला वनाधिकारी बळी पडतात, जनसामान्यांच्या आक्रमक भूमिकांमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते, अशा वेळी ॲक्शन घेताना वनाधिकाऱ्यांना महसूल व पोलीस विभागांची मदत राहणार नाही. परिस्थिती नुसार ॲक्शन घेण्याचा स्वातंत्र्य अधिकारी वनाधिकाऱ्यास मिळणार आहेत.पोलिसांप्रमाणे वन अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. वने, वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे याविषयी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. - सुधीर मुनगंटीवार, वन मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार