शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१,६१५ कोटींच्या निधीतून होणार रस्त्यांचे रुंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 00:15 IST

ह्याब्रीड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या ११ राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे.

४० टक्के निधी राज्य शासनाचा : ११ राज्य महामार्गांचा समावेशअमरावती : ह्याब्रीड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या ११ राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे. १६१५ कोटींच्या निधातून सदर रस्त्यांचे कामे होणार आहेत. ११ महामार्गावरील ४५९ किमीच्या रस्त्यांचे १० मीटरचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. १,६१५ कोटींच्या निधीतून होत असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत असल्याने त्यासंदर्भाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे सरू झाले आहे. या प्रकल्पाकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर सदर कामांच्या ई - निविदा काढण्यात येणार आहे. सदर काम ज्या कंत्राटदाराला मिळाल्यानंतर या कामांवर ६० टक्के निधींची गुंतवणूक त्याला करावी लागणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यानंतर शासन सदर कंत्राटदाराला १५ वर्षापर्यंत सदर कामांचे देयके परत करणार आहे. पण या १५ वर्षांमध्ये सदर रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल त्या कंत्राटदाराला करावी लागणार आहे. या कामांचे देयके शासन १५ पर्यंत अदा करणार असल्याच्य करारना म्यावरच काम देण्यात येणार असल्याची माहिती अमरावती बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता विवेक साळवे यांनी "लोकमत"शी बोलताना दिली आहे. ४५९ किलोमीटरचे करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये १० मीटर अंतरापर्यंत रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सदर रस्ते हे जूनेच असुन सर्व र स्ते हे राज्यमहामार्ग आहे. या मार्गावरुन हजारो वाहनांची रोज मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. यामध्ये अमरावती- मिनी बायपास, वलगाव- दर्यापूूर, अमरावती- भातकुली-आसरा, दर्यापूर - अंजनगाव, परतवाडा- चिखलदारा -घटांग, अमरावती - चांदुररेल्वे-धामणगांव रेल्वे, अमरावती् कुऱ्हा- कौंडण्यपूर आदी मार्गांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्र १२ पुलगाव ते कारंजा असा ७६.९० किलोमीटर लांबीचा रस्त्यांच्या कामांचेही यामध्ये समावेश राहणार आहे. त्यामुळे अनेक वेळा अरुंद रस्त्यांमुळे दोन वाहने समोरासमोर पास होतांना अनेक जीवघेणे अपघात घडतात. सदर रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर वाढत्या अपघातावर नियंत्रण ठेवणे सोपी जाणार आहे. व वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सदर कामांचे अद्याप तरी ई-टेंडरींग झाले नसून सदर कामे खेचून आणण्यास पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा सिंहाचा वाटा आहे. दोन महिन्यांत सदर कामे सुरू होणार असल्याचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर ई-निविदा होऊन दोन महिन्यांत सदर कामांना सुरुवात होईल कंत्राटदाराला कामांच्या तुलनेत ६० टक्के पैसे गुंतवणूक करावी लागणार आहे. - विवेक साळवे, अधीक्षक अभियंता सा.बां. विभाग, अमरावती